आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत‎:समाजाला विचारांची पालवी फुटणे गरजेचे‎

जळगाव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक जीवनात समाजाचा‎ घटक म्हणून जगत असताना‎ स्त्रियांचा, वंचितांचा, उपेक्षितांचा‎ आवाज होऊन जनतेच्या भाषेत‎ जनतेच्या आवाज होऊन लिहिणारा‎ हा खरा प्रतिभावंत असताे.‎ समाजातला आवाज घेऊन एक स्त्री‎ बोलते आहे, समाजाला संबोधते‎ आहे, कानउघाडणी करते आहे,‎ त्यावेळेस समाजा- समाजातली‎ माणसं जागे होणे गरजेचं असतं.‎ समाजाला विचारांची पालवी फुटणं‎ ही वर्तमानाची गरज अाहे, असे मत‎ ज्येष्ठ समीक्षक, तथा राज्याचे‎ शासन व्यवहार कोश सुलभीकरण‎ समिती अध्यक्ष केशव सखाराम‎ देशमुख यांनी व्यक्त केले.‎

कवयित्री इंदिरा जाधव लिखित‎ ‘पालवी’ कविता संग्रहाच्या‎ प्रकाशनप्रसंगी ते बाेलत हाेते.‎ लिखाणाचा परिवार व्यापक झाला‎ पाहिजे. धिक्कार करणारी कविता,‎ दृष्ट प्रवृत्तीला ठोकरणारी कविता‎ ‘पालवी’ कविता संग्रहात असून‎ समंजस विद्रोहाचा आवाज या‎ कवितासंग्रहात असल्याचे मत‎ त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास‎ प्रमुख अतिथी प्रा. ए. पी. चौधरी,‎ ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर,‎ डॉ. मिलिंद बागुल, प्राचार्य जयश्री‎ नेमाडे, युवराज माळी, मजीद‎ झकेरिया विचार मंचावर उपस्थित‎ होते. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल‎ यांनी केले. कवयित्री इंदिरा जाधव‎ यांनी आपल्या पालवी कविता‎ संग्रहाविषयी मनोगत व्यक्त केले.‎ प्राचार्य जयश्री नेमाडे, भगवान‎ भटकर यांनी आपले विचार मांडले.‎ याप्रसंगी किशोर नेवे लिखित ‘दिव्य‎ ज्योत’ कवितासंग्रहाचे प्रकाशन‎ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‎ सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप‎ सुरवाडकर यांनी केले. आभार‎ राजेंद्र पारे यांनी मानले. कार्यक्रमास‎ विजयकुमार मौर्य, शिवचरण‎ उज्जैनकर, शिवराम शिरसाठ, डी.‎ डी. पाटील, बापू पानपाटील, डॉ.‎ सत्यजित साळवे, , गोविंद पाटील, राहुल निकम,‎ शिरीष चौधरी, भय्यासाहेब देवरे व‎ मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम‎ यशस्वितेसाठी सागर फाळके, रवींद्र‎ फाळके, प्रशांत फडके, हेमांगिनी‎ फाळके, नेहा फाळके, प्रवीणा‎ जाधव, विद्याधर सोनवणे, माधुरी‎ कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.‎

रूढीवाद, परंपरा माेडीत निघावा : प्रतिभा शिंदे‎ महिलांचा आवाज हा निश्चितपणे समाजाचा भान जपणारा आणि दिशा‎ देणारा असतो. सामाजिक विषमतेच्या असणाऱ्या वातावरणात स्त्रियांना‎ मिळणारे स्थान परंपरा आणि रूढीवादी व्यवस्थेने दुय्यम ठेवलेले आहे. हा‎ रूढीवाद आणि परंपरा या मोडीत काढत स्त्रियांनी स्त्रियांचा आवाज बुलंद‎ करण्याची वेळ आज येऊन ठेपली अाहे. इंदिरा जाधव यांच्या कवितातून हा‎ बुलंद आवाज व्यक्त झाल्याचा अनुभव निश्चितपणे नवी ‘पालवी’ प्राप्त‎ करून देईल असे मत त्यांनी व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...