आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या पीक कर्जातून २०० रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आला. बँकेच्या सुमारे २०० नवीन कर्मचाऱ्यांची नियमानुसार पगारवाढ करण्याचा निर्णय झाल्याची माहिती चेअरमन संजय पवार यांनी दिली. पीक कर्जावर आकारण्यात येत असलेल्या २०० रुपये प्रक्रिया शुल्काला शेतकऱ्यांसह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालकांनीही विरोध केला होता. हे शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती. ‘दिव्य मराठी’ने २६ एप्रिल रोजी प्रक्रिया शुल्काबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.
पीक कर्जाची रक्कम खात्यात
ज्या शेतकऱ्यांच्या एटीएमची मुदत संपलेली आहे. त्यांना पीक कर्जाची रक्कम बँक खात्यात देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांची इतर जिल्ह्यात शेती असल्यास त्यांनाही पीक कर्ज देण्याबाबत मागच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
अशा शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी त्या जिल्ह्यातील तालुका निबंधकांची ना-हरकत आवश्यक आहे. संत मुक्ताई संस्थानने बँकेकडून चार ते पाच काेटींचे कर्ज घेतलेले आहे. थकीत कर्ज वसुलीसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू करण्याचा निर्णय आगामी बैठकीत हाेणार अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.