आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यांच्या जागांत बदल:रामानंद पाेलिस ठाणे मेहरुणमध्ये हलवले‎ तर पिंप्राळा हुडकाेचे अंतर दुपटीने वाढणार‎, गुन्ह्यांवरचे सुटेल नियंत्रण‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रामानंदनगर हे एकमेव पाेलिस‎ ठाणे स्वत:च्या इमारतीत नाही. जिल्हा‎ पाेलिस अधीक्षकांनी जागेची मागणी ‎ ‎ केल्यानंतर जागा निश्चित करण्याची‎ प्रक्रिया सुरू झाली असून ती अंतिम‎ टप्प्यात अाहे. मेहरुणमधील ४८३/२ या‎ गटात जागा ठरवण्यात येत अाहे. जागेची ‎ ‎ माेजणीही करण्यात अाली अाहे.

दरम्यान, ‎ निश्चित करण्यात येणारी जागा ही रामानंद ‎ ‎ पाेलिस ठाण्याच्या हद्दीच्या सुमारे एक ‎ ‎ किलाेमिटर बाहेर अाहे. तसेच हद्दीतील‎ सर्वात संवेदनशिल प्रिंप्राळा हुडकाेत‎ कायम दंगली, हाणामारी हाेतात. तेथे ‎ ‎ पाेहचण्यास पाेलिसांना अाताच्या‎ ठाण्यापेक्षा दुप्पट अंतर जावे लागेल.‎ रामानंदनगर पाेलिस ठाणे हद्दीत पिंप्राळा ‎ ‎ हुडकाे, समतानगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर अादी भाग‎ उतरत्या क्रमाने संवेदनशिल अाहे.‎

सर्वाधिक पिंप्राळा हुडकाे‎ संवेदनशील अाहे. त्या ठिकाणी‎ गेल्या वर्षभरात चार दंगली झाल्या‎ अाहेत. त्याचबराेबर हाणामारीच्या‎ घटना तर नेहमीच घडतात.‎ हाणामाऱ्यांचे रुपांतर दंगलीत हाेऊ‎ नये यासाठी जलद गतीने जादा‎ कुमक घटनास्थळी पाेहचणे‎ महत्वाचे ठरते. सद्यस्थितीत काेल्हे‎ नगरात असलेले रामानंदनगर‎ पाेलिस ठाणे ते हुडकाेपर्यंतचे अंतर‎ ३.६ किलाेमिटर अाहे. जर पाेलिस‎ ठाणे मेहरुणमध्ये गेले तर हे अंतर‎ दुपटीने वाढून ७ किलाेमीटर हाेईल.‎ त्यामुळे पाेलिसांची जादा कुमक‎ घटनास्थळी पाेहचण्यास वेळ‎ लागेल. ही बाब हरिविठ्ठलनगर,‎ खंडेरावनगर अादी भागाबाबत काही‎ प्रमाणात लागू हाेते.‎

चारही चाैक्या कायम बंदच‎

रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत‎ रामानंदनगर बसस्टाॅप, पिंप्राळा हुडकाे,‎ महाबळ काॅलनी शेजारी अाणि डी-मार्ट‎ समाेर अशा चार पाेलिस चाैक्या‎ उभारण्यात अाल्या अाहेत. मात्र, त्या‎ कायम बंद असतात. तेथे कायमस्वरुपी‎ पाेलिसांची नियुक्ती नसल्याने घटना घडली‎ तर पाेलिसांना पाेहाेचण्यासाठी विलंब हाेताे.‎

हद्दीच्या बाहेर पाेलिस ठाणे गेल्यास लांब व गैरसाेयीचे असल्याने सामान्य नागरीक‎ तेथपर्यंत जावून तक्रार देण्यास नाखूष असतील. त्यामुळे पाेलिस ठाण्याच्या डायरीवर‎ दाखल गुन्ह्यांची संख्या घटल्याचे दिसेल. परंतु, प्रत्यक्ष नियंत्रण नियंत्रण कमी झाल्याने‎ गुन्ह्यांची संख्या वाढेल. ते कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरेल. पाेलिस ठाणे हद्दीत‎ येणाऱ्या संवेदनशील भागात पाेहाेचण्यासाठीचा वेळही वाढण्याची शक्यता अाहे.‎

महाविद्यालये पडतील दूर‎

गुन्हेगारी साेबत कायदा व सुव्यवस्था‎ राखण्यात पाेलिसिंग ही महत्वाची बाब‎ असते.अाताच्या रामानंदनगर पाेलिस‎ ठाण्याच्या अर्धा ते पाऊण‎ किलाेमिटरच्या अंतरावर मुळजी जेठा‎ महाविद्यालय, शासकीय‎ अभियांत्रिकी, खासगी इंजिनिअरिंग‎ काॅलेज अाहे. हजाराे विद्यार्थी त्या‎ ठिकाणी शिक्षणासाठी येतात.‎ महाविद्यालयीन तरुणांत सतत वाद,‎ हाणामारीच्या घटनाही घडतात.‎ काेल्हे नगरात असलेल्या रामानंदनगर‎ पाेलिस ठाण्यात सतत पाेलिसांची‎ ये-जा असल्याने त्याचा वचक‎ उपद्रवी व टवाळखाेरांवर अापसूक‎ असताे. मात्र, पाेलिस ठाणे हद्दीबाहेर‎ गेले तर हा वचक कमी हाेऊ शकताे.‎