आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:गौतम बुद्धांना ‘बाॅयफ्रेंड’ संबोधणाऱ्या‎ तृतीयपंथी शमिभा पाटील आल्या चर्चेत‎, ट्राेलर्सकडून टीका तर जाणकारांकडून समर्थन‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समाज माध्यमांवर‎ पोस्ट लिहिताना उत्कट भावनावेगात‎ तथागत गौतम बुद्धांना ‘बाॅयफ्रेंड’‎ संबोधणे तृतीयपंथी शमिभा पाटील यांना‎ अचानक राज्यभरात चर्चेत घेऊन आले‎ आहे. शमिभा या वंचित बहुजन‎ आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या‎ सदस्य असून, तृतीयपंथी कल्याण‎ मंडळाच्याही सदस्य आहेत.

त्यांच्या या‎ पोस्टच्या समर्थनात अनेक मान्यवर‎ उतरले असले तरी ‘ट्रोलकरी’ मात्र,‎ अत्यंत गलिच्छ भाषेत त्यांच्यावर टीका‎ करण्यासाठी सरसावले आहेत.‎ जळगाव येथील तृतीयपंथी शमिभा‎ पाटील वंचित बहुजन आघाडीच्या‎ कार्यकर्त्या असल्या तरी‎ सर्वसामान्यांमध्ये फारशा परिचित‎ नव्हत्या.

बुद्ध जयंतीच्या दिवशी त्यांनी‎ समाज माध्यमामध्ये तथागत गौतम‎ बुद्धांना वंदन करताना व्हायोलिनजवळ ‎ बसलेल्या बुद्धांच्या फोटोसह पोस्ट केली. ‎ त्यावर ‘तू कायम होतास, आहेस व‎ राहणार. डियर बॉयफ्रेंड बुद्धा, हॅपी बर्थ‎ डे!’ अशा ओळी लिहिल्या आहेत. या ‎ पोस्टनंतर त्यांना राज्यभरातून ट्रोल‎ करायला सुरुवात झाली. त्याचवेळी‎ प्रख्यात कवयित्री डाॅ. प्रज्ञा दया पवार‎ यांनी शमिभाचे समर्थन केले.

डाॅ. पवार‎ लिहितात, ‘बुद्धाला बॉयफ्रेंड म्हणण्याची,‎ मानण्याची आणि त्याचा जाहीर उच्चार‎ करण्याची मानसिकता कशातून आकार‎ घेते हे समजून न घेताच शमिभाच्या‎ वक्तव्यावर अतिशय हिणकस, गलिच्छ‎ पद्धतीने तुटून पडणाऱ्या सर्वांनी बुद्ध पुन्हा‎ समजून तर घ्यावाच शिवाय संपूर्ण‎ भक्ती-साहित्य, विशेषत: स्त्रीरचित‎ भक्ती साहित्य नक्की वाचावं’.

पवार‎ यांच्या या प्रतिक्रियेलाही अनेकांनी पसंती‎ दर्शवली आहे. दिशा पिंकी शेख यांनीही‎ आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्या‎ म्हणतात,‘बुद्धाला आपलं मानणारे माझे‎ काही मित्र माझ्याबद्दल, माझ्या‎ समुदायातील बुद्धाला स्वत:च्या आकलन‎ ‎आणि अनुभवावरून चाचपडणाऱ्या‎ मैत्रिणींना निकृष, हिंसक,असूयायुक्त‎ दृष्टीने पाहतात याची जी काही वेदना‎ होतेय ती असह्य आहे.

क्षमा करा पण‎ आम्ही आमच्यातल्या बुद्धाशी आमचं‎ नातं सांगतो आहोत आणि तुम्ही सूत्रबद्ध‎ तत्त्वज्ञानाच्या चौकटीत तपासू पाहताय.‎ तुमच्याशी हरले मी पण स्वत: सोबतचा‎ शोध कायम राहील.’‎

माझ्याबाबत गलिच्छ वक्तव्य करणाऱ्यांना गौतम बुद्धांचे त्रिशरण, पंचशीलचा अर्थ‎ तरी कळलेला आहे काय? भावनिक, मानसिक व वैचारिक समतोल साधण्यासाठी‎ बुद्धांचे विचार उपयोगी आहेत. परमकल्याण मित्र बुद्धाला बॉयफ्रेंड म्हटले तर एवढे‎ वादंग उठले. हे नाते न समजून घेताच वक्तव्य करणाऱ्यांची मी माफी मागणार नाही.‎ सम्यक दृष्टीने चर्चा करायला तयार आहे.‎

- शमिभा पाटील, वंचित बहुजन आघाडी, जळगाव‎