आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तक्रार‎:सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावांना बगल तर‎ ठरावीक प्रभागांनाच निधीचे वाटप‎, उपमहापाैरांचा शिंदे गटावर राेख

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ‎ ‎शिवसेनेच्या नगरसेवकांची थेट‎ ठाकरे व शिंदे गटात विभागणी‎ झाली आहे. महापालिकेतील‎ सत्ताधारी ठाकरे गटाकडून‎ केलेल्या ठरावांच्या प्रस्तावाना‎ प्राधान्य न देता ठरावीक‎ प्रभागातील प्रस्तावांना मंजुरी देत‎ निधी वाटप केल्याचा गंभीर आराेप‎ उपमहापाैर कुलभूषण पाटील यांनी‎ केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना‎ पाठवलेल्या पत्रातून शिंदे गटाच्या‎ नगरसेवकांना महत्त्व दिल्याची‎ ‎तक्रार त्यांनी केली आहे.‎

आराेप करणाऱ्या उपमहापाैरांनी राजीनामा द्यावा‎

उपमहापाैर कुलभूषण पाटील यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये‎ वंचितांच्या वस्तीचा संपूर्ण पाच काेटींचा निधी खर्च केला हाेता. तेव्हा‎ अन्य प्रभागांवर अन्यायच केला हाेता. या विषयाला संपूर्ण सभागृहाचा‎ विराेध हाेता. आणखी निधी मागण्यापेक्षा त्यांनी आराेप करणे ही तर‎ लाजीरवाणी बाब आहे. त्यांनी उपमहापाैरपदाचा राजीनामा द्यायला हवा.‎

- अॅड. दिलीप पाेकळे, शिवसेना (शिंदे गट )‎

जिल्हा वार्षिक याेजनेंतर्गत‎ महापालिकेला अण्णा भाऊ साठे‎ दलित वस्ती सुधारणा याेजनेतून‎ १५ काेटी तर सुवर्ण जयंती‎ नगराेत्थान याेजनेतून सन‎ ‎२०२२-२३ अंतर्गत १० काेटींचा‎ निधी महापालिकेला मंजूर हाेता.‎ या निधीतून करण्यात येणाऱ्या‎ कामांचा प्राधान्यक्रम ठरवून‎ मनपात महासभेने प्रस्ताव मंजूर‎ करून महापाैर - आयुक्तांच्या मान्यतेने‎ प्रभागनिहाय विकास कामे‎ हाेण्यासाठी सादर केले हाेते; परंतु या‎ प्रस्तावांना राजकीय द्वेषातून व‎ हेतुपुरस्सरपणे बगल दिल्याचे‎ उपमहापाैरांनी जिल्हाधिकारी अमन‎ मित्तल यांना दिलेल्या पत्रात म्हटले‎ आहे.

विशेष म्हणजे महापाैर व‎ आयुक्तांनी सादर केलेल्या‎ प्रस्तावांना बाजूला सारत केवळ दाेन‎ ते चार प्रभागांतच पूर्ण निधी वळता‎ करण्यात आला आहे. यामुळे‎ विकास कामांचा असमताेल हाेऊन‎ जनतेचा आक्राेश सुरू आहे.‎ जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाने‎ पाठवलेल्या प्रस्तावानुसार मंजुरी‎ देऊन समताेल राखावा, अशी‎ मागणी केली आहे.‎