आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक व्यक्तीला दाेन मन असतत. एक चेतन दुसरे अचेतन. न बाेलता माैन बाळगले जाते पण विचारांचेही माैन असते. शरिराला शिथील ठेवून चित्त एकाग्र करणे हे सुद्धा माैनच आहे. तणाव कमी करून हृदयाची शक्ती वाढवण्याचे हे एक सशक्त माध्यम आहे असे मत वर्षा चाेरडिया यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या निर्देशानुसार जळगाव शाखेतर्फे अणुव्रत भवनात कार्यशाळा घेण्यात आली. त्यात त्या बाेलत हाेत्या. मंडळाच्या अध्यक्ष नम्रता सेठीया यांनी मान्यवरांचे स्वागत करून आगामी तीन कार्यक्रमांची माहिती दिली. ‘द पाॅवर ऑफ सायलेन्स’ या विषयावर चाेरडिया यांनी विचार मांडले.
नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे सांगून त्यांनी ध्यानधारणेचे महत्व व प्रात्यक्षिक सादर केले. दुसऱ्या सत्रात नाटिका सादर करण्यात आली. उमा सांखला यांनी त्यांना साथ दिली. मीना छाजेड, राणी चोरडिया, शीतल छाजेड, व मित्र धाडेवा यांचा सहभाग हाेता. शीतल बुच्चा यांनी सूत्रसंचालन केले. लघुनाटिकेत सहभागी कलाकारांना पारिताेषिक देऊन गाैरवण्यात आले. या वेळी मंडळाच्या सदस्या उपस्थित हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.