आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका‎ निवडणूक:मागच्यावेळी 28 फेब्रुवारीला झाली‎ हाेती प्रभाग रचना सुरू; यंदा शांतताच‎

जळगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या‎ महापालिकेच्या सार्वत्रिक‎ निवडणुकीचा माहाेल अन् आताचे‎ वातावरण यात कमालीची तफावत‎ जाणवू लागली आहे. तापमान‎ वाढीमुळे उन्हाचे चटके वाढले असले‎ तरी राज्य निवडणूक आयाेगाकडून‎ काेणतेही आदेश नसल्याने राजकीय‎ वातावरण मात्र अजून थंडच आहे.‎ गेल्या वेळी फेब्रुवारी महिन्यातच प्रभाग‎ रचना सादर करण्याचे आदेश झाल्याने‎ राजकीय धुळवळीने रंग भरायला‎ सुरुवात झाली हाेती.‎ ओबीसी आरक्षणासंदर्भात‎ न्यायालयाने निर्णय न दिल्यामुळे दाेन‎ वर्षांपासून राज्यातील मनपाच्या‎ निवडणुका लांबल्या आहेत.‎ आैरंगाबादसह सर्वच मुदत संपलेल्या‎ मनपामध्ये प्रशासकामार्फत कामकाज‎ सुरू आहे. त्यामुळे लाेकप्रतिनिधी‎ निवडणूक जाहीर हाेण्याच्या प्रतीक्षेत‎ आहेत. जळगाव महापालिकेतही‎ त्याचेच संकेत मिळू लागले आहेत.‎

प्रभाग रचना कायम‎ राहण्याचे संकेत‎
यंदा निवडणूक अवघ्या पाच‎ महिन्यांवर येऊन ठेपली आहे;‎ परंतु राज्य निवडणूक‎ आयाेगाकडून काेणतेही निर्देश‎ प्राप्त झालेले नाहीत. मनपाच्या‎ निवडणूक विभागाला प्रभाग‎ रचना अथवा अन्य बाबी तयार‎ करण्याच्या सूचना नसल्याचे‎ सांगण्यात आले. त्यामुळे इतर‎ महापालिकांप्रमाणेच जळगाव‎ महापालिकेची निवडणूक‎ लांबणीवर पडणार की काय?‎ असा प्रश्न या निमित्ताने‎ नगरसेवक उपस्थित करू लागले‎ आहेत. शासनाने चार सदस्यीय‎ प्रभाग पद्धती कायम ठेवण्याचा‎ निर्णय घेतला आहे. त्यामुळे‎ जळगाव महापालिकेला फार‎ काही बदल करावे लागण्याची‎ शक्यता कमीच असल्याचेही‎ सांगितले जात आहे.‎

साडेचार वर्षांपूर्वी या‎ हाेत्या जळगावात हालचाली
२०१८मध्ये झालेल्या जळगाव मनपाच्या‎ सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य‎ निवडणूक आयाेगाने १२ जानेवारी २०१८‎ राेजी आदेश काढत ईव्हीएम मशीन‎ ठेवलेल्या गाेडावून अद्ययावत‎ ठेवण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. १७ व‎ १८ जानेवारी २०१८ राेजी राज्य निवडणूक‎ आयाेगाच्या तीन महिला अधिकाऱ्यांनी‎ प्रत्यक्ष पाहणी केली हाेती. त्यानंतर १७‎ फेब्रुवारी २०१८ राेजी प्रारूप मतदार यादी‎ प्रसिद्ध केली हाेती. २८ फेब्रुवारी २०१८‎ राेजी प्रारूप प्रभाग रचना तयार करून‎ सादर करण्याचे आदेश दिले हाेते.‎

४ एप्रिल २०१८ राेजी निघाले हाेते आरक्षण साेडत‎
मागच्या निवडणुकीत साडेचार वर्षांपूर्वी मार्च महिन्यापासून राजकीय जुगलबंदीला‎ सुरुवात झाली हाेती. मार्च २०१८ हा खऱ्या अर्थाने इच्छुकांसाठी राजकीय करिअर‎ निश्चितीचा काळ ठरला. १५ मार्च २०१८ राेजी राज्य निवडणूक आयाेगाकडे प्रारूप‎ प्रभाग रचना सादर करण्यात आली हाेती. त्यानंतर ३१ मार्च राेजी साेडत काढण्यासाठी‎ जाहीर नाेटीस प्रसिद्ध करण्यात आली हाेती. तर ४ एप्रिल राेजी आरक्षण साेडत व‎ प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यंदा मात्र चित्र उलटे आहे.‎

२७ बंडखाेर नगरसेवकांना‎ सतावतेय भवितव्याची चिंता‎
मनपा निवडणुकीसाठी वारे थंड असले‎ तरी भाजपतून फुटलेल्या २७‎ बंडखाेरांच्या भवितव्याचे वारे मात्र गरम‎ आहेत. दिल्ली येथे ८ राेजी सुनावणी‎ हाेऊन १४ राेजी अंतिम युक्तिवाद व‎ निर्णय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे‎ न्यायालयाच्या निर्णयानंतर विभागीय‎ आयुक्त आपला निकाल जाहीर‎ करण्याची शक्यता आहे. जर २७‎ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र‎ करण्यात आले तर त्यांना पुढील दाेन‎ निवडणुका लढता येणार नाही अशीही‎ जाेरदार चर्चा सुरू झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...