आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबू स्वस्त:लिंबू शंभरवरून ४० रुपये किलाे‎, मध्य प्रदेश, बिहार राज्यातील व्यापाऱ्यांकडून मालाची उचल घटली‎

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ उन्हाळ्यात गुणकारी म्हणून ‎सरबतसाठी लिंबूला वाढती‎ मागणी असते. त्यामुळे गेल्या ‎आठवड्यापर्यंत किरकाेळ‎ बाजारात १०० रुपये किलो मिळणारे लिंबाचे दर शनिवारी ४०‎ रुपयांपर्यंत खाली आले हाेते.‎

मध्य प्रदेश व बिहार येथील‎ व्यापाऱ्यांकडून मालाची उचल‎ घटल्याने हे दर घटले आहे.‎

मागणी वाढती

उन्हाची तीव्रता कमी‎ करण्यासाठी सरबतासाठी,‎ लग्नसराईत जेवणावळीत,‎ उसाच्या रसात चवीसाठी लिंबूचा‎ वापर केला जाताे. त्यामुळे‎ अचानक लिंबाची मागणी वाढते.‎ खान्देशातील उत्राण, जामनेर,‎ पाचोरा येथील लिंबांना मोठी‎ बाजारपेठ आहे. थेट मध्य प्रदेश‎ अाणि बिहार राज्यातील व्यापारी‎ जळगाव बाजार समितीत येऊन‎ मालाची खरेदी करतात.

लिंबाची आवक वाढली

गेल्या‎ पंधरवड्यापासून त्यांच्या राज्यात‎ मालाची मागणी कमी झाल्याने‎ त्यांनी खरेदीसाठी येणे थांबवले‎ असल्याचे बाजार समितीचे‎ लिलावसमन्वयक वासुदेव पाटील यांनी सांगितले.‎ दरम्यान, घाऊक बाजारात लिंबाची मागणी‎ वाढती असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील‎ शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर माल‎ बाजारपेठेत अाणला जात हाेता; परंतु बाहेरचे‎ व्यापारी येणे बंद झाल्याने स्थानिक‎ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना माल ताेडू नका,‎ असा सल्ला दिला. तरीही बाजार समितीत‎ मोठ्या प्रमाणावर माल येत आहे. दरराेजची‎ अावक १५ ते २० क्विंटल हाेत आहे.‎