आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्त इशारा:बोगस बियाणे विक्री करणाऱ्या‎ दुकानांचा परवाना रद्द करावा‎, खरीप हंगाम आढावा बैठकीत गुलाबराव पाटलांचे आदेश‎

प्रतिनिधी | जळगाव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम तोंडावर असतांना बोगस‎ बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना‎ रद्द करण्यात यावा, त्यांच्यावर कठोर कारवाई‎ करून धडा शिकवा, असे निर्देश पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच पीक‎ कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर‎ मागणाऱ्या बॅकांवर कारवाई होणार असल्याचेही‎ पालकमंत्र्यांनी सांगितले.‎ अजिंठा विश्रामगृहात आयोजित‎ जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत‎ पालकमंत्री हे बोलत होते. या वेळी आमदार‎ एकनाथ खडसे, चिमणराव पाटील, संजय‎ सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल व इतर‎ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची होणारी‎ फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी‎ केलेल्या बियाणे, खतांचे पक्के बिल‎ विक्रेत्याकडून घ्यावे. जिल्हा व तालुकास्तरावर‎ भरारी पथकांची स्थापना करण्यात बोगस‎ बियाण्यांची विक्री करणाऱ्यांना व खतांचा कृत्रीम‎ टंचाई करणाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी धडा‎ शिकवण्यासाठी कठोरात कठोर कारवाई करावी.‎ बियाणे व खते बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे‎ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तक्रार घेण्यासाठी टोल‎ फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा अशा‎ सूचना देण्यात आल्या.

अवकाळी पावसाने‎ झालेल्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा‎ निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल.‎ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने‎ वेळोवेळी तातडीने मदत जाहीर केली आहे.‎ मार्चमध्ये झालेल्या अवकाळीचा आपल्या‎ जळगाव जिल्ह्यातील १८ हजारापेक्षा अधिक‎ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तातडीने २० कोटी ४२ लाख रुपयांची नुकसान‎ भरपाई देण्यात आली आहे.यावेळी तालुका‎ स्तरावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात‎ याव्यात असे चिमणराव पाटील व एकनाथ‎ खडसे यांनी सूचित केले. या वेळी विविध‎ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.‎

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅकांकडून‎ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप नाही‎

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती‎ बँक मार्फत ७२८ कोटी ९४ लक्ष पिक कर्ज‎ वाटप उदिष्टपैकी ४८ टक्के म्हणजे ३४८ कोटी‎ ८६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.‎ राष्ट्रीयकृत बॅकांनी पीक कर्ज वाटप केलेले‎ नाही. या बॅकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप‎ करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.‎

शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा द्या‎‎

अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर आवश्यक त्या‎ ठिकाणी नवीन हवामान यंत्र अपडेट करून‎ मनेरगा किंवा इतर शासनाच्या योजनामधून‎ शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनाची माहिती‎ पोहचून लाभ देण्याबाबत तत्पर राहा. लोडशेडिंग‎ बंद असून महावितरणाने शेतीसाठी अखंड वीज‎ पुरवठा करण्याबाबत दक्ष राहावे. पर्जन्यमानाची‎ अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार‎ योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.‎