आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तुकाराम बीज महाेत्सव:संत तुकाराम महाराजांच्या नावाने मंगल‎ कार्यालय, वसतिगृह उभारले जाणार‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारकरी संप्रदायाचे प्रणेते जगतगुरू संत‎ तुकाराम महाराज यांच्या नावाने‎ शहरातील मध्यवर्ती भागातील खुल्या‎ जागेत भव्य मंगल कार्यालयासह‎ वसतिगृहाची उभारणी केली जाणार‎ आहे. त्यासाठी काथार वाणी समाज‎ मंडळाने तयारी सुरू केली आहे.‎ गुरुवारी तुकाराम बीज महोत्सवानिमित्त‎ होणाऱ्या सोहळ्यात याबाबत‎ शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची‎ माहिती काथार कंठहार वाणी समाज‎ सेवा संघाचे अध्यक्ष अजय‎ कामळस्कर यांनी ‘दिव्य मराठी’शी‎ बोलताना दिली. दरम्यान,‎ सोहळ्यानिमित्त गुरुवारी भव्य‎ शोभायात्रेसह विविध उपक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎ रिंगरोडवरील महापालिकेच्या सुमारे‎ १० हजार स्क्वेअरफूट खुल्या जागेत‎ भव्य मंगल कार्यालयासह वसतिगृह‎ उभारण्याचे नियोजन आहे.‎ महापालिकेने समाजाच्या‎ पदाधिकाऱ्यांना ही जागा उपलब्ध‎ करून दिली आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी‎ या ठिकाणी भूमिपूजन होऊन‎ कोनशिलेचे अनावरणही झाले आहे. या‎ जागेला आता ऊर्जितावस्था देत‎ महापालिकेकडून अंतिम परवानगी प्राप्त‎ करून घेत, मंगल कार्यालयाच्या‎ बांधकामास सुरुवात केली जाणार‎ आहे. यासाठीची रचना, आराखडाही‎ तयार करण्यात आला आहे. संत‎ तुकाराम महाराजांच्या नावाने शहरात‎ एकही शासकीय वास्तू नसून कुठल्याही‎ जागेस त्यांचे नाव देण्यात आलेले नाही.‎ याविषयी महापालिकेसह प्रशासनाकडे‎ अनेकदा मागणीही केली आहे. त्यामुळे‎ समाजबांधवांनी या जागेवर मंगल‎ कार्यालय उभारणीचा संकल्प करीत‎ कामास सुरुवात केली आहे.

शहरात आज भव्य मिरवणूक, चित्ररथ‎
तुकाराम बीज महोत्सवानिमित्त गुरुवारी सकाळी ८.३०‎ वाजता नागो गणू वाणी मंगल कार्यालयात प्रतिमा पूजन‎ होईल. यासह दुपारी ४ वाजता संत तुकाराम यांच्या‎ प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात‎ टाळकरी, भजनी मंडळ, बॅण्ड पथक, लेझीम पथक,‎ संत तुकाराम महाराजांचा आकर्षक असा चित्ररथ‎ असणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार‎ सुरेश भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी‎ पक्ष नेते सुनील महाजन उपस्थित राहणार आहेत.

प्रशस्त सांस्कृतिक‎ सभागृहाचेही नियोजन‎
रिंगराेडवरील जागेवर मंगल‎ कार्यालय, सांस्कृतिक सभागृह,‎ बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी‎ वसतिगृहाचीही उभारणी केली‎ जाणार आहे. यासाठी सुमारे एक‎ कोटीपर्यंतचा निधी हा‎ समाजबांधवांमधून देणगी रूपातून‎ उभारला जाणार असल्याचेही‎ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याकार्यास‎ गती देण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या‎ बीज महोत्सवात समाजबांधवांच्या‎ संमतीने निधी उभारण्यास सुरुवात‎ केली जाणार आहे. या कार्यासाठी‎ विजय वाणी, सतीश वाणी, वासुदेव‎ वाणी, मुकुंदा वाणी, अरविंद वाणी,‎ पुरुषोत्तम वाणी, भूषण हरणे,‎ भालचंद्र वाणी यांनी पुढाकार घेतला‎ असून ते नियोजन करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...