आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात पाणीपुरवठ्याच्या कामांना सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागात अद्याप व्यवस्था नसल्याने जिल्हा परिषदेने यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी तब्बल साडेसात कोटींची तरतूद केली आहे तर महिला व बालकल्याण विभागासाठी दीड कोटींची तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेकडून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी बुधवारी ठराव समितीकडे मांडला.
यावर्षीचा अर्थसंकल्पही प्रशासकाने सादर केला असून, ३३ कोटी ८० लाख रुपयांच्या संकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. २०२२-२३चा मूळ अर्थसंकल्प २९ कोटींचा होता. ठराव समितीसमोर हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समितीने मंजुरी दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने सलग दुसऱ्या वर्षीदेखील सदस्यांविनाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
अशा आहेत तरतुदी
यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही ग्रामीण पुरवठा विभाग व पंचायत राज विकास विभागासाठी प्रत्येकी ७ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर बांधकाम विभागासाठी ५ कोटी ३० लाख, समाज कल्याण विभागासाठी १ कोटी ६० लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी १ कोटी ३७ लाख रुपये, कृषी विभागासाठी १ कोटी, गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी ३३ लाख तरतूद करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.