आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगावच्या प्रवाशांना राजधानी मुंबईत घेऊन जाणारी अमरावती मुंबई-अमरावती (क्रमांक १२११२-१२१११) एक्स्प्रेस पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. अमरावती ते मुंबई या दोन शहरादरम्यान दैनंदिन धावणाऱ्या या गाडीचे द्वितीय शयनयान श्रेणीचे (स्लीपर क्लास) पाच डबे १५ जूनपासून कमी करण्यात येऊन त्या ऐवजी तृतीय श्रेणी वातानुकूलित (थर्ड एसी) अतिरिक्त सहा डबे जोडले जाणार आहे. दरम्यान, स्लीपरचे पाच डबे कमी होणार असल्याने मुंबईचा प्रवास भुर्दंड देणारा ठरणार आहे. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केली होती. त्या वेळी त्री साप्ताहिक असलेल्या या गाडीची लोकप्रियता वाढून ही गाडी पुढे दैनंदिन करण्यात आली.
वाढता प्रतिसाद पाहता गतवर्षी १४ जून २०२२ रोजी पारंपरिक कोच हटवून ही गाडी एलएचबी कोचद्वारे धावण्यात सुरुवात झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोच संरचना बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सर्व सामान्यांना मुंबईवारी घडवणारी ही एक्स्प्रेस पूर्णत: वातानुकूलित परिवर्तीत झाली तर त्यांचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे.
अशी आहे आताची संरचना
एसी फर्स्ट काम एसी टू टियर १/२, एसी टू टियर २, एसी थ्री टियर ४, स्लीपर ७, जनरल ४. अशी राहिल बदलेली संरचना एसी फर्स्ट काम एसी टू टियर १, एसी टू टियर २, एसी थ्री टियर १०, स्लीपर २, जनरल ४.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.