आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी पुरवठ्याचे प्रमुख जलस्त्राेत असलेल्या माेठ्या प्रकल्पांमध्ये 42.86 टक्के जलसाठा होता. हा जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 5.21 टक्के अधिक वाढला आहे. दरम्यान मध्यम प्रकल्पात एकूण 29.14 टक्के पाणी साठा सध्या आहे.
आता नाे चिंता!
असे असताना जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात 69.31% पाणीसाठा आहे. (4.84 % अधिक) तर लघु प्रकल्पांमध्ये 14.86 % टक्के जलसाठा आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्याला फार माेठ्या पाणी टंचाईला सामाेरे जावे लागणार नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. जिल्ह्यत गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्पात जलसाठ्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात हतनूर, गिरणा व वाघूर हे तीन माेठे प्रकल्प आहेत. तर अंभाेरा, मंगरुळ, सुकी, माेर, अग्नावती, हिवरा, बहुळा, ताेंडापुर, अंजनी, गुळ, भाेकरबारी, बाेरी व मन्याड हे 13 मध्यम प्रकल्प आहेत. तर लघु प्रकल्पांची संख्या 96 आहे.
प्रकल्प यंदाचा साठा, गेल्या वर्षीचा साठा, अधिकचा साठा (टक्केवारीत)
हतनूर- 28.63%, 16.63% 12.00%, गिरणा- 37.23%, 35.16%, 2.07%, वाघुर- 69.31%, 64.47%, 4.84%, माेठे प्रकल्प एकूण- 42.86%, 37.65%, 5.21% 13 मध्यम प्रकल्प एकूण- 29.14%,2.02%,1.02%, 96 लघु प्रकल्प एकूण- 14.87%, 4.06%
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.