आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना एक मार्चपर्यंत परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. सध्या प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी ४९ दिवसांचा कालावधी उरला आहे.
बोर्डाच्या वेळापत्रकानुसार २१ फेब्रुवारी ते २१ मार्च बारावी आणि २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीच्या परीक्षा होणार आहेत. फॉर्म भरण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. राज्य परीक्षा मंडळाने लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. अतिविशेष विलंब शुल्कासह दहावीच्या विद्यार्थ्यांना १३ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरता येईल.
बारावीसाठी ४ ते २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. विद्यार्थी-पालकांनी अधिक माहितीसाठी https://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिविशेष विलंब शुल्कासह १३ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरता येईल. बारावीसाठी ४ ते २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. https:// www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे सूचित करण्यात आलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.