आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्रदूषण : राज्यात जळगाव द्वितीय क्रमांकावर तरी‎ धावताहेत आयुष्यमान संपलेली 35 हजार वाहने

विजय राजहंस | जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎जिल्ह्याची लाेकसंख्या ४५ लाखांच्या‎ घरात असताना वाहनांची संख्या ११‎ लाखांहून अधिक आहे. वाहनांच्या‎ आयुष्यमानाचा विचार केला तर १५‎ वर्षांनंतर ते पर्यावरणाला अधिक हानी‎ पाेहाेचवते. एक ते दाेन वर्षे ग्रीन टॅक्स‎ भरून याेग्यता प्रमाणपत्र घेऊन अशी‎ वाहने कार्यरत करता येऊ शकतात;‎ परंतु १५ ते १७ वर्षांपेक्षाही जुनी ३५‎ हजारांहून अधिक वाहने जिल्ह्याच्या‎ प्रदूषणात भर पाडत आहेत. राज्यात‎ मुंबईनंतर सर्वाधिक प्रदूषण जळगावात‎ असून त्यात ही जुनी वाहनेही‎ कारणीभूत ठरत आहेत.‎ जिल्ह्यात वाहनांच्या नाेंदणी,‎ परवाना आदींबाबत नियंत्रणासाठी‎ उपप्रादेशिक परिवहन विभाग आहे.‎

त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार एप्रिल‎ ते मार्च २०२१ दरम्यान जिल्ह्यात‎ वाहनांची संख्या ११ लाख १९ हजार‎ २५९ एवढी हाेती. एप्रिल ते डिसेंबर‎ २०२२ या कालावधीत त्यात १ लाख ४१‎ हजार १११ वाहने नव्याने नाेंदवली गेली‎ आहेत. वाहनांचे सामान्य आयुष्य १५‎ वर्षे असले तरी त्यात पर्यावरण कर‎ भरून दरवर्षी याेग्यता प्रमाणपत्र घेऊन‎ वाहनाची पुनर्नाेंदणी करता येते.‎

त्यासाठी वाहन हे तांत्रिकदृष्ट्या‎ वापरण्यायाेग्य असणे अपेक्षित आहे.‎ गेल्या दाेन वर्षांत १६ वर्षांपेक्षा अधिक‎ आयुष्यमान असलेल्या पाचशेहून‎ अधिक रिक्षा उपप्रादेशिक परिवहन‎ विभागाने स्क्रॅपमध्ये (भंगारात) काढून‎ थेट जेसीबीने ताेडल्या हाेत्या. त्यानंतर‎ शहरात वाहतुकीदरम्यान निघणारे धुराचे‎ लाेळ कमी झाले. रिक्षांसह इतर दुचाकी,‎ चारचाकी वाहनांचा एकत्रित आकडा‎ मात्र नगण्य आहे. १ जानेवारी २०१५ ते ३१‎ डिसेंबर २०२२ या सात वर्षांच्या‎ कालावधीत अवघी १०१९ वाहने ही‎ भंगारात गेली. त्यामुळे मुदतवाह्य‎ वाहनांवरील कारवाईचा मुद्दाही आता‎ पुढे येऊ पाहत असल्याचे दिसते आहे.

एअर प्युरिफायर लावणार, चार चार्जिंग स्टेशन उभारणार‎
जळगाव शहर महापालिकेने‎ तातडीने राष्ट्रीय शुद्ध हवा‎ कार्यक्रमांतर्गत शहरात चार‎ ठिकाणी वायुप्रदूषण राेखणारे‎ चार्जिंग स्टेशन बनवण्याची‎ तयारी सुरू आहे. शासनाकडून‎ ८६ लाखांचा निधीही आहे.‎

कालबाह्य झालेल्या सर्वाधिक दुचाकी; पर्यावरणाला बाधा‎
जिल्ह्यात भंगार झालेल्या वाहनांतून‎ प्रदूषण हाेऊन पर्यावरणाला हानी पाेहाेचते.‎ याबाबत आरटीआेकडे स्वतंत्र‎ आकडेवारी उपलब्ध नाही; परंतु अशा‎ वाहनांची संख्या किमान ३० ते ३५‎ हजारांच्या पुढे असल्याचा अंदाज सूत्र‎ व्यक्त करतात. त्यातही दुचाकींचा‎ आकडा निम्म्यांहून अधिक आहे. त्यानंतर‎ नंबर येताे ताे विटा, रेती, इतर गाैण‎ खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या‎ वाहनांचा. आरटीआेकडे या वाहनांचा‎ एवढा माेठा आकडा असताना वाहन‎ तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ‎ नसल्याचे कारण पुढे केले जाते.‎

हवेची गुणवत्ता १५०च्या पुढे‎
महाराष्ट्रात मुंबईनंतर जळगाव हे‎ प्रदूषणात राज्यात दुसरे सर्वाधिक प्रदूषित‎ शहर आहे. जळगावातील हवेची‎ सरासरी गुणवत्ता (एक्यूआय) १५० ते‎ १६४च्या दरम्यान आहे. शहरात पीपीएम‎ १० या धूलिकणांचे प्रमाण १६४च्या‎ पातळीवर तर पीपीएम २.५ धूलिकणांचे‎ प्रमाण १५७वर आहे. त्यात वाहनांतून‎ निघणाऱ्या धुरामुळे हवा अधिक प्रदूषित‎ हाेत आहे. मुंबईतील हवेचा एक्यूआय‎ १७७च्या पातळीवर आहे. त्यामुळे‎ प्रदूषणाचा विषय एेरणीवर आला असून‎ ताे अधिक चिंतेचा बनू पाहताे आहे.‎

बातम्या आणखी आहेत...