आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:शेतकऱ्याच्या पत्राची‎ पंतप्रधान मोदींकडून दखल‎, नदीच्या पुराचे पाणी वळवून जलपुनर्भरणाची मांडली होती संकल्पना

यावल‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डोंगरकोठारा येथील‎ रहिवासी तथा महानिर्मितीच्या‎ ‎ सेवानिवृत्त‎ ‎ कर्मचाऱ्याने‎ ‎ जलपुनर्भरणाची‎ ‎ संकल्पना‎ ‎ सुचवणारे पत्र‎ ‎ पीएमओला‎ लिहिले होते. त्याची दखल घेत‎ दिल्लीतील पीएमओ कार्यालयाने‎ त्यांना संपर्क करून संकल्पना‎ समजून घेतली.‎

डोंगरकठोरा येथील रहिवासी‎ पुरुषोत्तम इच्छाराम ठोमरे हे‎ सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते‎ सध्या शेती करतात. तसेच ते‎ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की‎ बात हा कार्यक्रम नियमित ऐकतात. ‎ यादरम्यान त्यांनी भूजल‎ पूनर्भणाबाबत सूचवलेली संकल्पना ‎ पीएमओ कार्यालयास मेलद्वारे ‎ ‎कळवली. नंतर पत्रदेखील पाठवले. ‎ ‎

यानंतर काही दिवसांनी पीएमओ ‎ ‎कार्यालयातून थेट पुरुषोत्तम ठोमरे‎ यांना संपर्क करण्यात आला. ‎ ‎ जलपुनर्भरणाची त्यांची नेमकी ‎ संकल्पना काय आहे? त्याचा कसा ‎ ‎फायदा होईल? हे समजून घेण्यात ‎ ‎ आले. दरम्यान, थेट देशाच्या‎ पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या ‎ कॉलमुळे शेतकरी ठोमरे हे भारावून ‎ ‎ गेले आहेत.‎

अशी आहे संकल्पना‎

पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर‎ अतिरिक्त पाणी पात्रातून वाहून‎ जाते. भौगोलिक स्थितीचा अभ्यास‎ करून हे वाहून जाणारे पाणी दोन्ही‎ बाजूने ठिकठिकाणी नदीपात्रातून‎ वरील भागात वळवावे. काही‎ ठरावीक अंतरानंतर वळवलेले पाणी‎ पुन्हा नदीपात्रात सोडता येईल अशी‎ व्यवस्था करावी. म्हणजे ते‎ उताराच्या दिशेने खाली जमिनीत‎ पाझरेल. परिणामी वाहून जाणारे‎ पाणी वाया न जाता ते वळवलेल्या‎ भागात जमिनीत जिरून भूजल‎ पातळी वाढेल, अशी शेतकरी ठोमरे‎ यांची संकल्पना आहे.‎