आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया अद्यापही बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू केली जाते आहे; परंतु त्यासाठी आता आधार सक्ती केली असल्याने आधार व्हेरिफिकेशनच्या आधारे शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अन्यथा, संच मान्यता हाेणार नाही. सर्व शाळांना दरवर्षी संच मान्यता करून घेणे अनिवार्य आहे. शाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक संख्या आणि त्यांचे वेतन ही प्रक्रिया संच मान्यतेच्या आधारे केली जाते. संच मान्यता नसेल तर शिक्षकांच्या वेतनात अडचणी येतात.
दरवर्षी शाळा सुरू होताना जून ते एप्रिल महिन्यातील वर्गानुसार विद्यार्थी संख्या मोजली जाते. ३० सप्टेंबरपर्यंत असलेली शाळेतील विद्यार्थी पटसंख्या निश्चित केली जाते. विद्यार्थी संख्या किती आहे? त्यानुसार शिक्षकांची संख्या ठरवली जाते. जर शिक्षकांची संख्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अधिक असेल तर शिक्षक अतिरिक्त ठरतो आणि विद्यार्थी संख्या जास्त असेल तर पद भरतीसाठी मान्यता देण्यात येते. ही प्रक्रिया शाळांनी दरवर्षी करणे अपेक्षित आहे. ही सर्व प्रक्रिया सरल पाेर्टलद्वारे हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.