आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात 1171 प्रस्ताव:एकाच कुटुंबातील भावंडांना घरकुल योजनेत‎ बहुमजली इमारत बांधून राहता येईल एकत्र‎

प्रतिनिधी | जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील ५००पेक्षा जास्त अर्ज आता ठरणार पात्र‎

एकत्र कुटुंबात सामाईक‎ जागेअभावी एकापेक्षा जास्त‎ भावंडांना घरकुल योजनेचा लाभ‎ मिळण्यात येणाऱ्या अडचणी‎ सुटल्या आहेत. कारण केंद्र‎ शासनाने आता एकाच कुटुंबात‎ एकापेक्षा जास्त प्रधानमंत्री आवास‎ योजनेतील लाभार्थ्यांना बहुमजली‎ इमारत उभारून लाभ देण्याचा‎ महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.‎ यामुळे शहरातील ५०० पेक्षा जास्त‎ लाभार्थी असलेल्या भावंडांना‎ एकाच ठिकाणी राहण्याचा मार्ग‎ मोकळा झाला आहे.‎

एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त‎ भावंडे असल्याने सामाईक‎ जागेवर पंतप्रधान आवास‎ योजनेचा लाभ घेण्यावरून वाद‎ निर्माण होत असतात. त्यामुळे‎ प्रत्येक जण आपणच वारसदार‎ असल्याचे दाखवून लाभ‎ मिळवण्यासाठी धडपडत‎ असतात. जागेचा प्रश्न अन्‎ महागाईचा विचार करता उंच‎ इमारतींचा पर्याय योग्य ठरतो‎ आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र‎ शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल‎ घटकातील लाभार्थ्यांना पात्र‎ ठरवण्यात आले आहे. यात‎ लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीच्या‎ जागेवर घरकुल बांधण्यासाठी‎ अनुदान दिले जाते आहे. पात्र‎ कुटुंबातील सज्ञान कमावता‎ व्यक्ती हादेखील प्रधानमंत्री‎ आवास योजनेतील घरकुलासाठी‎ पात्र ठरवण्यात आला आहे.‎

केंद्र शासनाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत नुकताच‎ महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यात एकाच कुटुंबात‎ एकापेक्षा जास्त पीएमएवायचे लाभार्थी असल्यास व‎ त्यांची जागा सामाईक असल्यास अशा पात्र‎ लाभार्थ्यांना पीएमएवायचा लाभ घेणे शक्य व्हावे‎ यासाठी त्यांना सामाईक जागेवर बहुमजली इमारत‎ बांधण्यासाठी आता परवानगी देण्यात येणार आहे.‎

मनपाच्या माध्यमातून घरकुलांच्या लाभार्थ्यांचे‎ ११७१ प्रस्ताव पात्र आहेत. यातील २५३ घरे‎ बांधण्यात येत आहेत. तर उर्वरित प्रस्तावांना‎ नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीसाठी‎ सादर केले आहेत. यामुळे एकाच कुटुंबातील एका‎ पेक्षा जास्त भावंडांना एकाच ठिकाणी इमारत‎ बांधून स्वतंत्र मालकी हक्काने राहता येणार आहे.‎

--