आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आवर्तनासाठी हतनूर‎ धरणावर 4 तास ठिय्या‎

वरणगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हतनूर धरणातून आवर्तन न‎ सुटल्याने गेल्या १५ ते २०‎ दिवसांपासून वरणगाव शहरासह‎ परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या‎ पाण्याची टंचाई होती. त्यामुळे हतनूर‎ धरणातून आवर्तन सोडण्यात यावे,‎ या मागणीसाठी भाजप‎ पदाधिकाऱ्यांनी चार तास हतनूर‎ धरणावर ठिय्या आंदोलन केले.‎ माजी नगराध्यक्ष सुनील काळे,‎ भाजप शहराध्यक्ष गोलू राणे, जिल्हा‎ उपाध्यक्ष मिलिंद भैसे, तालुकाध्यक्ष‎ साबीर कुरेशी, फझल नुरमोहहमद,‎ सुरेश महाजन, सूपडू पाटील,‎ वासुदेव इंगळे, सचिन महाजन,‎ सुनील माळी, आकाश निमकर,‎ तेजस जैन, ज्ञानेश्वार घाटोळे आदी‎ उपस्थित होते. वरणगाव शहरात‎ पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी‎ नाही. यासाठी भाजपने चार तास‎ ठिय्या आंदोलन केला. चार‎ दिवसांपासून ग्रामविकास मंत्री‎ गिरीश महाजन यांच्याकडे‎ पाठपुरावा केल्यानंतर, मंत्र्यांनी‎ अधिकाऱ्यांना आवर्तन सोडण्याच्या‎ सूचना केल्या. नंतर आवर्तन सुटले.‎

बातम्या आणखी आहेत...