आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBSE RESULT:बारावीत तनया पाटील 96.20 टक्के मिळवून शहरात प्रथम‎, दहावीत तनिष्का‎ अग्रवालला सर्वाधिक 99.2 टक्के‎

प्रतिनिधी | जळगाव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे‎ घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि‎ बारावी परीक्षांचा शुक्रवारी ऑनलाइन‎ निकाल जाहीर झाला. यंदा परीक्षेत प्रथमच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेची काठिण्य‎ पातळी अधिक होती; मात्र तरी देखील‎ निकालात घसरण झाली नसून शहरात‎ दहावी परीक्षेत सेंट जोसेफ विद्यालयाची‎ तनिष्का दिनेश अग्रवाल ही विद्यार्थीनी‎ ९९.२ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे‎ तर बारावी परीक्षेत रुस्तमजी इंटरनॅशनल‎ स्कूलची विद्यार्थीनी तनया पाटील ही‎ ९६.२० टक्के गुणांसह अव्वल आली आहे. ‎

नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत‎ बोर्ड परीक्षेच्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये यंदा‎ बदल करण्यात आला होता. सीबीएसई‎ बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत‎ गुणवत्तेवर आधारित अनेक प्रश्न‎ विचारण्यात आले होते. बोर्ड परीक्षेत‎ क्षमता आधारित प्रश्नांची संख्या सुमारे ४०‎ टक्के आणि बारावीत ३० टक्के होती. हे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांमध्ये विचारण्यात आले होते. यंदा प्रथमच हा‎ बदल करण्यात आल्याने काही विद्यार्थी गोंधळले होते. याशिवाय रचनात्मक प्रतिसाद वेळ,‎ प्रतिपादन आणि तर्क आणि केस आधारित प्रश्न देखील विचारण्यात आले होते. दहावीच्या‎ विद्यार्थ्यांनी नियमित शाळा केल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा अवघड वाटली नाही परिणामी निकालही‎ चांगला लागला त्या तुलनेत बारावीच्या विद्यार्थ्यांनी नियमित वर्ग न केल्याने व कोरोना काळात‎ अभ्यास मागे पडल्याने या वर्षाचा निकाल घसरल्याचे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले.‎