आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात यायला हवी.‘राम मंदिर तो झाँकी है, देशभर के चार लाख मंदिर अभी बाकी है’ असे सांगत सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्याचा संकल्प मंदिर परिषद समारोपात करण्यात आला. हिंदू जनजागृती समिती व पद्मालय देवस्थानतर्फे दोन दिवसीय मंदिर ध्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिर हे शक्तिकेंद्र, भक्तिकेंद्र आणि धर्मशिक्षण देणारे केंद्र असले पाहिजे. मंदिरात भाविक भक्तिभावाने दान देतात, त्यामुळे मंदिरांतील निधी राजकीय स्वार्थापोटी विकास कामांसाठी वापरला जाऊ नये. मंदिरांचे विश्वस्त, सदस्यांचे उत्तम संघटन उभे राहिल्यास देशभरातील चार लाख मंदिरे सरकारीकरण मुक्त होतील असेही मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले. हिंदू जनजागृती समितीचे कोणतेही मंदिर नाही.
मात्र, प्रत्येक मंदिर हे हिंदू जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी लढा देऊ, अशी घोषणा ‘हिंदू जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली. राजकीय, न्यायव्यवस्था क्षेत्रांतील काही व्यक्ती मोठेपणासाठी विश्वस्त मंडळात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंदिरे ही व्यक्तिगत लाभासाठी नाहीत. जेव्हा मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे जाईल, तेव्हा मंदिरांचा विकास निश्चित होईल, असे आचार्य सुधीरदास महाराज यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.