आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक व दुर्बल घटकांतील पाल्यांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात २७ अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता ३१२२ जागांसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन सोडत निघणार असल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग होईल. छाननीत एकाच विद्यार्थ्याचे दोनपेक्षा अधिक अर्ज असल्यास एकच अर्ज मंजूर करण्यात आला. संपूर्ण छाननीत २७ विद्यार्थ्यांचे अर्ज बाद झाले. बुधवारी पुणे येथून पहिली ऑनलाइन सोडत निघणार आहे. त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश दिले जातील. जळगाव जिल्ह्यात एकूण २८२ आरटीई प्रवेशासाठी संलग्न शाळा आहेत. त्यात ३१२२ एवढी प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात एकूण ११ हजार ३१७ जणांचे अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर या अर्जाची संख्या ११ हजार २९० झाली आहे.
दरम्यान, यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत चौपट विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्याने चुरस बघायला मिळणार आहे. गेल्यावर्षी २८५ शाळांत प्रवेश देण्यात आले होते. तुलनेने यंदा शाळा कमी झाल्या आहेत. तर जागा देखील कमी झाल्या. गेल्यावर्षी ३१४७ जागांसाठी ८३५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात काही जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक व जागा कमी असल्याने जागा रिक्त राहणार नसल्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.