आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुस्तकातले धडे माहिती, त्यांचे लेखक मात्र तब्बल 85 टक्के‎ विद्यार्थ्यांना माहितीच नाही, खेळाच्या माध्यमाने घेतली परीक्षा‎

धनश्री बागूल | जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या पाठ्यपुस्तकांतून इयत्ता दहावीचा‎ अभ्यास केला जातो त्या पुस्तकांतील‎ इंग्रजीच्या धड्यांची नावे तर माहिती‎ आहेत, पण त्यांच्या लेखकांची नावे‎ तब्बल ८५ टक्के विद्यार्थ्यांना माहितीच‎ नाहीत. संस्कृत पुस्तकातील तर‎ धड्यांची नावेही ४० टक्के विद्यार्थ्यांना‎ नीट माहिती नाहीत, असा निष्कर्ष एका‎ आगळ्या वेगळ्या परीक्षेनंतर समोर‎ आला. या मुलांना पाठ्यपुस्तकांतून‎ अभ्यास करायची सवय लागावी म्हणून‎ ही परीक्षा घेतली.‎

नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या‎ शहरातील ए.टी. झांबरे शाळेतच हा‎ उपक्रमही राबवण्यात आला आहे.‎ विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक पुस्तकांतून तयार‎ उत्तरे पाठ करण्याऐवजी पाठ्यपुस्तके‎ बारकाईने वाचावीत आणि त्यातील‎ माहिती लक्षात ठेवण्याची सवय लावून‎ घ्यावी म्हणून शाळेचे प्रयत्न सुरू‎ आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून‎ मुलांच्या वाचन सवयी जाणून‎ घेण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची ही‎ परीक्षा घेण्यात आली. दीडशे विद्यार्थी‎ त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.‎ मराठी, इंग्रजी, संस्कृत, इतिहास,‎ भूगोल, गणित १आणि २, विज्ञान १‎ आणि २ अशा नऊ विषयांची ही परीक्षा‎ होती. त्यात या विषयांच्या धड्यांची‎ नावे आणि त्याचे लेखक विद्यार्थ्यांनी‎ लिहायचे होते. सुमारे ११९ धड्यांची‎ नावे विद्यार्थ्यांनी यावेळी लिहिली. मात्र,‎ लेखकांची नावे आठवण्यात त्यांना‎ फारसे यश आले नाही हे विशेष हाेय.‎

असा निघाला निष्कर्ष‎
मराठीचे ८० टक्के धडे तर ४०‎ टक्के लेखक विद्यार्थ्यांना माहीत‎ आहे. इंग्रजी विषयाचे ४५ टक्के‎ धडे तर १५ टक्केच लेखक‎ विद्यार्थ्यांना माहीत आहे. संस्कृत‎ विषयात ४० टक्के मुलांना‎ धड्यांची नावे देखील नीट‎ लिहिता आली नाही. गणित १ व‎ गणित २ विषयात मात्र ६० टक्के‎ मुलांना व्यवस्थित उत्तरे लिहिता‎ आली. विज्ञान १ व विज्ञान २‎ विषयात तर आणखीनच प्रगती‎ दिसून आली तब्बल ७५ टक्के‎ विद्यार्थ्यांना याचे ज्ञान होते.‎ शिकवणी व सततच्या सरावाने‎ या दोन विषयात विद्यार्थी पुढे‎ राहिले. तर इतिहास, भूगोलात‎ ७८% विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली.‎

बझर वाजवणे, चिठ्ठ्या, बादफेरीनुसार उत्तरे‎
ही आगळी वेगळी परीक्षा खेळाच्या माध्यमातून घेण्यात आली.‎ त्यासाठी खेळाच्या वेगवेगळ्या फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. बझर‎ वाजवणे, चिठ्ठ्या काढणे, बाद फेरी अशा स्वरूपात विद्यार्थ्यांनी उत्तरे‎ दिल्याने त्यांना आनंदही मिळाला आणि आपल्याला अभ्यास कसा‎ करायचा आहे याचे आकलनही त्यांना प्रकर्षाने झाले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...