आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्चच्या पहिल्याच आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. १० अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान २ मार्च राेजी १६ अंश सेल्सिअसवर गेल्याने रात्रीचा गारठा हरवला आहे. दिवसा कमाल तापमानाचा पारा ३५.५ अंशावर असताना किमान तापमानही वाढल्याने थंडीची तीव्रता पूर्णपणे कमी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान निच्चांकी आणि कमाल तापमान उच्चांकी पातळीवर हाेते.
मार्च महिन्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानात सहा अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने रात्रीच्या वेळी २ मार्च राेजी पहाटे हवेतील गारवा कमी झालेला हाेता. या आठवड्यात किमान तापमान १७ अंशापुढे राहण्याची शक्यता आहे. २८ फेब्रुवारीपासून राज्यात वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ४ आणि ५ मार्च राेजी ढगांची तीव्रता अधिक वाढेल. खान्देशात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हाेवू शकताे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झालेली असेल. तरी उकाडा मात्र जाणवणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.