आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक संपर्क अभियान:‘जि.प.’च्या 40 पैकी दोन शाळांची गुणवत्ता‎ घसरली; सुधारणेसाठी महिनाभराची मुदत‎

धनश्री बागुल | जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी‎ अधिकारी शाळांना भेटी देत आहे.‎ जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या‎ शाळांमधील पालक संपर्क अभियानाचा‎ चौथा टप्पा नुकताच राबवण्यात आला.‎ या अंतर्गत जिल्ह्यातील चाळीसहून‎ अधिक शाळांना भेटी देण्यात आल्या.‎

यात अमळनेर येथील नांद्री जिल्हा‎ परिषद शाळेला उपस्थिती वाढवण्याच्या‎ सूचना देण्यात आल्या तर धरणगाव‎ तालुक्यातील वाघळूद येथे विद्यार्थ्यांना‎ वाचनात अडचणी येत असल्याने या‎ शाळेला गुणवत्ता वाढीसाठी अधिक‎ प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी‎ दिल्या आहे.‎ दर महिन्याला जिल्हा परिषदेचे मुख्य‎ कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग‎ प्रमुख आणि तालुकास्तरी यंत्रणा कमी‎ गुणवत्ता असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या‎ शाळांना भेटी देतात.

डिसेंबर महिन्यातही‎ अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या.या‎ भेटींचा अहवाल नुकताच सादर झाला‎ असून, यात शाळांना देण्यात आलेल्या‎ सूचना मांडण्यात आल्या आहे. यात‎ जळगाव जिल्ह्यातील चाळीसहून‎ अधिक शाळांना पंधरा अधिकाऱ्यांसह‎ त्यांच्या पथकांनी भेटी दिल्या.

यात‎ अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव,‎ पारोळा, पाचोरा, भुसावळ, मुक्ताईनगर,‎ जळगाव, रावेरसह सर्वच तालुक्यातील‎ जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या‎ विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद‎ साधला. यात वाचन, लेखन, गणित‎ आदींबाबत प्रश्न विचारण्यात आले. यात‎ गेल्या दोन भेटींच्या तुलनेत यंदा प्रगतीत‎ वाढ झालेली दिसून आली तर काही‎ तालुक्यांमध्ये मात्र परिस्थिती ‘जैसे थे’‎ दिसून आली. गुणवत्ता न वाढलेल्या‎ शाळांना महिनाभराचा अल्टिमेटम‎ देण्यात आला आहे.‎

पथकाच्या पाहणीनंतर अहवालात हे नोंदवले निष्कर्ष‎
डिजिटलायझेशनचा वापर वाढला.‎ यावल तालुक्यात व्ही स्कूलचा वापर.‎ रावेर तालुक्यात पेपर कृती उत्तम.‎ अमळनेर तालुक्यात उपस्थिती कमी.‎ चाळीसगाव तालुक्यात उत्कृष्ट प्रगती.‎ धरणगाव तालुक्यात गुणवत्ता ढासळली.‎

चाळीसगाव तालुक्यात‎ इंग्रजीचे वाचन उत्तम‎
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे‎ येथील जिल्हा परिषद शाळेत‎ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असता‎ याठिकाणी चौथीच्या विद्यार्थ्यांचे‎ इंग्रजीचे वाचन उत्तम असल्याचे‎ दिसून आले. तर पिंपळगाव प्र.दे.‎ येथील जिल्हा परिषद शाळेत‎ देखील वाचन क्षमता चांगली‎ असल्याचे दिसून आल्याने‎ याठिकाणी अधिकाऱ्यांनी गुणवत्ता‎ वाढवल्याने समाधान व्यक्त केले.‎ यासोबतच वावडदा येथे‎ डिजिटलायझेशन अधिक असून‎ याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...