आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. उन्हाने तापमानात सातत्याने वाढ होते आहे. अनेक शहरांमध्ये तापमान कमालीचे वाढले आहे. दरम्यान उष्णतेचे तापमान देखील वाढले आहे, वाढत्या उष्माघाताने अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. अशातच उष्माघातामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जळगावमध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडतांना देखील विचार करत आहेत. दरम्यान सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. जळगाव आणि विदर्भात उन्हाने कहर केला आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिजर्व बँक चौकात एका व्यक्तीचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना कॉटन मार्केट परिसरात घडली आहे.
उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू
जळगावात आणखी एकाचा उष्माघाताने बळी घेतला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबार येथील 48 वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. उष्णाघाताचा चाळीसगाव तालुक्यात पहिला तर जळगाव जिल्ह्यातील दुसरा बळी गेल्याने संपुर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी हे सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत सुंदरलाल गढरी यांची घरची परिस्थिती बेताची व गरीबीची आहे. मोलमजुरी करून तसेच बकऱ्या चारून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत चालवत होते. सुंदरलाल यांच्या मृत्युनंतर मेहूणबार परिसरात एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान मृत गढरी यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. सुंदरलाल गढरी हे घरातील कमावता व्यक्ती असल्याने त्यांचा परिवार आज उघड्यावर पडला आहे. उष्माघाताची तालुक्यात ही पहिलीच घटना असून जळगाव जिल्ह्यातील उष्माघातामुळे मृत्यू पावल्याची ही दुसरी घटना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.