आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा तीव्र जनआंदोलन‎:महानिर्मितीची वेल्हाळे राख बंडाची निविदा रद्द करावी‎

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ‎ वेल्हाळे येथील राख बंडाची निविदा‎ कायस्वरुपी रद्द करावी, या मागणीसाठी‎ सोमवारी (दि.६) वेल्हाळे ग्रामस्थ,‎ लोकसंघर्ष मोर्चाने दीपनगर येथील‎ औष्णिक वीज केंद्रावर धडक मोर्चा‎ काढला. त्यात सर्वपक्षीय पदाधिकारी‎ सहभागी झाले. महा निर्मितीच्या या‎ निविदेमुळे वेल्हाळेसह २० गावांतील दोन‎ हजार ग्रामस्थांचा रोजगार हिरावला‎ जाईल असा आरोप आंदोलकांनी केला.‎ मोर्चाला लोक संघर्ष मोर्चाचे चंद्रकांत‎ चौधरी, माजी सभापती राजेंद्र चौधरी,‎ समाधान चौधरी, राष्ट्रवादीचे दीपक‎ मराठे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश‎ सरदार यांच्यासह सर्वपक्षीय‎ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

वेल्हाळे‎ येथील राखेच्या बंडामुळे किमान दोन‎ हजार ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे.‎ महानिर्मितीने या राखेची निविदा‎ काढल्याने स्थानिकांमध्ये महा निर्मिती व ‎ ‎ अधिकाऱ्यांबाबत रोष निर्माण झाला‎ आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रकल्पासाठी‎ आपल्या जमिनी दिल्या. ते भूमीहीन‎ झाले. आता राखेपासून निर्माण होणारा‎ रोजगारही हिरावला जात आहे, असा‎ आरोप आंदोलकांनी केला. हेमंत पाटील,‎ सतीश पाटील, विजय पाटील, मिलिंद‎ सुरवाडे, नागो पाटील, गोलू राणे, बाळू‎ ढाके, पुरुषोत्तम पाटील, डेबा पाटील,‎ राजू सुरवाडे उपस्थित होते.‎

निविदा रद्द करण्याच्या निर्णय घेईपर्यंत‎ माघार घेणार नाही, अशी भूमिका‎ मोर्चेकऱ्यांनी घेतली. यानंतर दीपनगरचे‎ मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी‎ मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. आपले म्हणणे‎ व निवेदन वरिष्ठांपर्यंत पाठवू. त्यातून‎ सकारात्मक मार्ग निघेल, असे सांगितले.‎ यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.‎ मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन‎ करण्याचा इशारा दिला.‎

बातम्या आणखी आहेत...