आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा ब्रह्मश्री महिला मंडळातर्फे संत ज्ञानेश्वर मंदिरात ‘महिलांचे चाळिशीनंतरचे शारीरिक व मानसिक आरोग्य’ यावर व्याख्यान झाले. यात डॉ. रेवती गर्गे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक स्त्रीने कुटुंबा बरोबर स्वतःची काळजी घेतली पाहिजे. व्यायाम, योगा आणि आहारावर लक्ष देणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. कार्यक्रमात छाया वाघ, भाग्यश्री राव, हेमलता कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
या वेळी पिंक रिक्षा महिलाचालक संगीता बारी, पौर्णिमा कोळी, माधुरी भालेराव, जयश्री कुवर, मीना कोळी, रंजना सपकाळे, माधुरी निळे, रंजना पवार या महिलांचा सन्मान करण्यात आला. रिक्षाचालक महिलांनी विविध अनुभव कथन केले. विशाखा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. परिचय मृदुला कुलकर्णी यांनी करुन दिला. मंजूषा तेंडूलकर यांनी आभार मानले. सुचिता कुलकर्णी, मेधा कुलकर्णी, पल्लवी भंडारी, सविता काळे यांनी नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.