आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाेन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत पाेळून निघालेल्या मुंबई आणि काेकणात शनिवारी देखील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमान नाेंदवले गेले. समुद्र किनारपट्टीवर वाढत्या तापमानात आर्द्रतेमुळे उकाडा असह्य झाल्याने मुंबई ते केरळपर्यंत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्रात साेमवारपासून अवकाळी पावसाचे सावट असल्याने काहीशा ढगाळ वातावरणात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली आहे.
भारत माैसम विभागाने राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट १८ मार्चपर्यंत लांबणार असल्याचा अंदाज शनिवारी वर्तवला आहे. जळगावसह उत्तर महाराष्ट्रात १३ व १४ मार्च असे दाेन दिवस अवकाळी पाऊस हाेण्याची शक्यता असल्याने गहू, हरभरा, मक्याचे नुकसान हाेऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.