आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव कडक उन्ह, मुसळधार पाऊस व गारपीट अशा तीनही प्रकारचे धक्के यंदाच्या एप्रिल महिन्याने दिले. कमाल १९ तर किमान ४२.४ अंश सेल्सिअस तापमान एप्रिलमध्ये राहिले. तर ३० पैकी नऊ दिवस पारा चाळिशी पार गेला.
मे महिन्यात पंधरा दिवस पारा चाळिशीच्या पुढे तर सर्वाधिक तापमान ४६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
आरबी समुद्रात दबाव
एप्रिल महिन्यात किमान तापमान हे १९ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले तर कमाल तापमान हे ४२.४ डिग्रीपर्यंत पोहोचले. एप्रिल महिन्यात कधीही अपेक्षित नसलेली गारपीट यंदा झाली. अरबी समुद्रात निर्माण झालेली दबावाची स्थिती आणि बाष्पयुक्त ढगांची निर्मिती या मुळे ही गारपीट झाली.
सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळ झाली की पावसाळा असे तीनही ऋतूंची अनुभूती देणारा एप्रिल महिना ठरला. दरम्यान, या तापमानाच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. १२ ते १७ आणि १९ ते २१ एप्रिल असे नऊ दिवस पारा चाळीशीपार गेला होता.
चक्रीवादळातून दिलासा
येत्या ७ ते ९ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत होऊ शकतो. मात्र, जळगाव जिल्ह्यावर त्याचा परिणाम हाेणार नाही असा अंदाज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.