आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामायमाती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या महिलांनी ‘क्लीन व्हीलेज’चे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप साळुंखे, प्रमोद साळुंखे हे उपस्थित होेते. सुहास पाटील, वत्सला पाटील, अर्चना महाजन, संगीता सपकाळे, कृषी विभागातील शिवाजी राऊत, मिलिंद वाल्हे, सोनू पाटील यांनी मार्गदर्शन केले.
‘माझे गाव, माझी जबाबदारी, ग्रामविकासात महिलांच्या पुढाकाराचे महत्त्व’ हा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आला हाेता. गावाचा सरपंच कसा असावा, स्वच्छतेच्या दृष्टीने गावामध्ये असलेल्या त्रुटी, आरोग्याच्या समस्या यावर महिलांनी मते मांडली. यात दहा महिलांनी यात सहभाग घेतला. तसेच रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. यात ३४ मुलींनी सहभाग घेतला. मायमाती फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रभावती पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सचिन बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक चंदा चौधरी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.