आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याशिवाय महाविद्यालय सुरू होणार नाहीत अशी माहिती आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असेही सामंत म्हणाले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये येऊन सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लवकरच राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही विचार केलेला नाही. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर याबाबत विचार होणार आहे. मात्र राज्यभरातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत तत्त्वतः निर्णय घेतला आहे. सुरु करताना काय नियम असावा, याबाबत दिवसांमध्ये निर्णय घेऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ग्रंथालये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले असून लवकरच ग्रंथालये सुरू होणार असल्याचे सामंत म्हणाले.
जानेवारी पासून सीमावर्ती भागात शैक्षणिक संकुल सुरू करणार
सीमा भागातील शैक्षणिक संकुलाबाबत बोलताना सामंत म्हणाले, सीमा भागातील शिनोळी या गावात दहा एकर जागा आहे. त्या ठिकाणी लवकरच शैक्षणिक संकुल उभे करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून याठिकाणी विविध अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे.
शिक्षणसंस्था चालकांनी फी वसुल केली तर कारवाई केली जाईल
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालये बंद होती. असे असतानाही संस्थाचालक विद्यार्थ्यांच्याकडून फी घेत असतील तर, अशा संस्थाचालकांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार दाखल करावी. अशा संस्थांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.