आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे (अंबाबाई) दर्शन घेतले. तसेच सरत्या वर्षात सर्वांना अत्यंत अडचणीचे गेले. मात्र येणारे २०२१ वर्षे हे सर्वांना आनंदाचे, सुखा समाधानाचे, आरोग्य ऐश्वर्याचे जावो, असे साकडे अंबाबाई चरणी घातले, तसेच ऊर्जेची गरज असते तेव्हा आईचे आशिर्वाद घेत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.दर्शना मागे कोणताही राजकीय हेतू , कोणतेही मिशन नसल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले 2020 हे वर्ष सर्वांसाठीच अडचणीचे ठरले आहे. आता हे वर्ष सरत आले आहे. नव्या वर्षाच्या आगमनापूर्वी आईचे दर्शन घेतले आहे. जेंव्हा कधी ऊर्जेचे गरज असते तेव्हा आशीर्वादाची गरज असते, आणि त्यावेळी आशीर्वाद घ्यावेच लागतात असे सांगितले.
भाजपकडून वारंवार महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाष्य केले जाते. त्यातच फडणवीस यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यामुळे आणि देवीकडे नव्या आव्हानांसाठी ऊर्जेची कामना केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.