आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादचे व जालन्यात आरटीओ अधिकारी असलेले अभिजीत रिळे हे नुकतेच कोल्हापूरची कन्या डॉ. अभिलाषा पुरेकर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकले. डोक्यावर अक्षता पडताच अभिजीत यांनी उपस्थितांना पाचच मिनिटे थांबून राहण्याची विनंती केली. वधू-वरांनी एकमेकांना हार घातला अन् लगेच उपस्थितांना नवरदेवाने रस्ता सुरक्षेची शपथ दिली. इतकेच नाही तर उखाणा घेताना देखील रस्ता सुरक्षेचा जागर करण्यास अभिजीत विसरले नाहीत.
जालन्यात कार्यरत, कोल्हापूरमध्ये लग्न
आरटीओ कार्यालय, जालना येथे कार्यरत असलेले सहायक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत रिळे यांचा विवाह दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी कोल्हापूर येथे पार पडला. महाराष्ट्रातील व देशातील वाढती अपघात संख्या पाहता आरटीओ कार्यालय, जालना येथे कार्यरत असलेले अभिजीत रिळे हे रस्ता सुरक्षा संबंधी आपले कर्तव्य विवाह प्रसंगी सुद्धा विसरले नाहीत.
रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा
स्वतःच्या विवाह प्रसंगी आपली वधू डॉ. अभिलाषासह सर्व उपस्थितांना रस्ता सुरक्षा नियम पालनाची शपथ देऊन कायम हे नियम पाळावेत असे आवाहन केले. त्यांच्या या कार्यास सतत प्रेरणा देणारे डेप्युटी आरटीओ विजय काठोळे व एआरटीओ विजय काळे व कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या या कृतीचे समाजातील सर्व लोकांकडून व वरिष्ठ कार्यालयाकडून कौतुक होत आहे.
मंडपातूनच वऱ्हाडींना आवाहन
आम्ही आमच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना 1 जुलै 2022 पासून रस्ता सुरक्षा नियम पालन करण्याची शपथ देत आहोत. कोविडमध्ये गतवर्षातील मृतांची आकडेवारी बघितली तर त्यापेक्षाही जास्त अपघातात लोक मृत झाले आहेत. या लग्नसोहळ्यानिमित्ताने माझ्या लग्नात माझीच लोक आले आहेत. नवरीकडील मंडळी नव्याने जोडले गेले आहेत. त्यामुळे ही संधी मी सोडणार कशी? असे ते म्हणाले. तसेच प्रतिज्ञा म्हणत सर्वांनाही ती घ्यायला लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.