आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कालीचरण महाराजांनी रायपूर येथील धर्मसभेत महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना 95 दिवस गजाआड देखील राहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानाची मालिका संपलेली नाही. आता नथुराम गोडसेचे समर्थन करुन त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे.
आता काय म्हणाले?
आज कालिचरण महाराज पुन्हा बरळले आहेत. ते म्हणाले, नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते. महात्मा नथुराम गोडसे नसते तर धर्म बुडाला असता. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
लहानपणापासून अध्यात्माकडे ओढा
कालीचरण महाराजांचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. ते एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडीलांचे औषधांचे दुकान आहे. कालीचरण महाराजांचा लहानपणापासून अध्यात्माकडे अधिक ओढा होता. कालीचरण महाराजाने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.