आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी-नेहरूंच्या संकल्पनेतली काँग्रेस संपली:साताऱ्यातील सावरकर गौरव यात्रेत शिवेंद्रसिंह राजेंची टीका, उदयनराजेंच्या दांडीने चर्चांना उधाण

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साताऱ्यात भाजपच्यावतीने काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, महापुरुषांचा अपमान करण्यामुळे काँग्रेसची देशात वाताहत झाली असून महात्मा गांधी आणि पंडीत नेहरुंची काँग्रेस संपली असल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

काँग्रेस पक्ष आणि राहूल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. महापुरुषांना कमी लेखणे व त्यांचा अपमान करणे, यातून काँग्रेसची देशात वाताहात झाली आहे. महात्मा गांधी आणि पंडीत नेहरुंची काँग्रेस संपली असून आतातरी काँग्रेसने सुधारावे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

काँग्रेसला झटका मिळेल

छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या विरोधातही काँग्रेस खत पाणी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवेंद्रसिंहराजेंनी केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करण्याचाच हा प्रकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी हा त्याचाच दुसरा भाग आहे. हिंदू धर्माविषयी प्रेम असलेली जनता आगामी निवडणूकांत काँग्रेसला मतांच्या रुपाने झटका देईल, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

राजकीय वर्तुळात चर्चा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खा. उदयनराजे भोसले हे नवी दिल्ली येथे असल्याने ते गौरव यात्रेत हजर नव्हते. परंतु, त्यांच्या समर्थकांनी देखील गौरव यात्रेकडे पाठ फिरवली. त्यामुळे उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

सावरकर गौरव यात्रेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक होत कॉंग्रेस आणि राहूल गांधींवर टीका केली. यापुर्वी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपतींचा अवमान केला होता. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांची भूमिका एवढी आक्रमक पाहायला मिळाली नव्हती. तसेच भाजपबद्दलच्या निषेधाचा सूर नरमाईचा होता, हे देखील दिसून आले होते.