आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकने कायम दुष्काळी जत तालुक्यातील ६५ गावासाठी पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसाळ योजनेच्या पुढील टप्प्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची व जानेवारी महिन्यापासून काम सुरू करण्याची केलेली घोषणा ही खोटी व निराधार आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.
जत तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या या योजनेच्या प्रकल्पासाठी जी बैठक नुकतीच बोलावण्यात आली होती त्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा विभागाचे सचिव उपस्थितच नव्हते. ही बैठक केवळ जल जीवन मिशनअंतर्गत कामासाठी बोलावली होती. या कामासाठी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी २०० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली असली तरीही यामध्ये विस्तारित म्हैसाळसाठी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, असा घरचा आहेर जगताप यांनी िदला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.