आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ शनिवारी येवले फाटा येथे उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिली. या भीषण अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. सुटीसाठी पुणे येथे गेलेले नौदल अधिकारी अजिंक्य शिरोटे हे जयसिंगपूरला येत असताना शनिवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात अजिंक्य शिरोटे (३८), स्मिता शिरोटे (३५), पूर्वा शिरोटे (१४), सुनेषा शिरोटे, (१०) व विरेन शिरोटे (५) यांचा मृत्यू झाला. अजिंक्य शिरोटे हे आपल्या कारने (एमएच १४ डीएन ६३३९) पुण्याहून जयसिंगपूरला परतत होते. या वेळी येवले फाटा येथे रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा होता. या वेळी शिरोटे यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कंटेनरला जाऊन धडकली होती. यात ५ जणांचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.