आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ल्यांवर मद्यपान कराल तर 3 महिने शिक्षा‎:जे स्वयंसेवक असे प्रकार उघडकीस आणतील त्यांना दंडाच्या 50 टक्के रक्कम मिळेल बक्षीस‎

मुंबई‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना ‎ ‎ यापुढे किमान तीन महिने कारावास ‎ ‎ तसेच किमान दहा हजार रुपये दंड ‎ ‎ आकारण्याचे प्रस्तावित आहे.‎ त्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्यात ‎ ‎ येतील. जे स्वयंसेवक असे प्रकार ‎ ‎ उघडकीस आणतील, त्यांना दंडाच्या ‎ ‎ पन्नास टक्के रक्कम बक्षीस म्हणून ‎ ‎ देण्याचेही प्रस्तावित आहे. राज्याच्या‎ विधी व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी‎ हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची‎ घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर‎ मुनगंटीवार यांनी विधानसभेत‎ सोमवारी (१३ मार्च) केली. रायगड‎ किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारीत‎ येतो. तो किमान पाच वर्षांसाठी तरी‎ राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा,‎ अशी विनंती केंद्राला केल्याचेही ते‎ म्हणाले.‎ राज्यातील गडकिल्ल्यांच्या‎ संरक्षण, जतन, संवर्धनाचा मुद्दा‎ लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून‎ उपस्थित करण्यात आला होता.‎ संग्राम थोपटे, अशोक चव्हाण,‎ भीमराव तापकीर आदींनी हा मुद्दा‎ उपस्थित केला होता.‎ त्यावर निवेदन करताना सुधीर‎ मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ३८७‎ संरक्षित स्मारके आहेत. मागील‎ सरकारच्या काळात या स्मारकांच्या‎ देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते.‎ निधीदेखील पुरेसा दिला जात नव्हता.‎ आता मात्र जिल्हा नियोजनापैकी‎ सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात‎ येणार आहे. ७५ स्मारकांच्या ठिकाणी‎ जन सुविधा निर्माण करण्याचे कार्यही‎ हाती घेण्यात आले असून त्यासाठी‎ ६५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार‎ आहे. शौचालये बांधण्यासाठी सुलभ‎ इंटरनॅशनलला तीस वर्षांचे कंत्राट‎ देण्यात येणार आहे. सर्व ३८७‎ स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर‎ कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून‎ देण्यात येणार आहे. किल्ल्यांवरील‎ अतिक्रमणेही दूर करण्यात येत‎ आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.‎

राजगुरू स्मारकाचा आराखडा २ महिन्यांत‎ हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे‎ आहे. त्यांच्या स्मारकाबाबत शासन पुढाकार घेऊन काम करीत आहे. या‎ स्मारकाबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्याच्या‎ किमतीत आता वाढ झाली आहे. या स्मारकाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची‎ समिती तयार करण्यात येईल. त्यात आमदारांच्या सूचनांचा अंतर्भाव करून‎ दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक‎ कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...