आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर भाजप नेत्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडी शनिवारी मुंबईत महामोर्चा काढणार आहे. यात १ लाख लोक सहभागी होतील, असा आघाडीचा दावा आहेे. भायखळा ते सीएसएमटी असे ५.३० किमी अंतर मोर्चेकरी चालणार आहेत. सरकारने १४ अटींसह मोर्चाला परवानगी दिली. दुसरीकडे डॉ. आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा. संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप नेते मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करणार आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांकडून कुरघोडीचे राजकारण तापवले जात आहे.
मविआचे टार्गेट
भाजपचे टार्गेट
मोर्चात २५ पक्ष -संघटना
समाजवादी पक्ष, सीपीआय, सीपीएम, लाल निशाण पक्ष, शेकाप, मराठा क्रांती ठोक मोर्चा, रिपाइंचा निकाळजे गट अशा २५ पक्ष-संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिल्याचा आघाडीचा दावा आहेे.
दिव्य मराठी एक्सप्लेनर
राज्यपाल बदल अटळ, आघाडीला श्रेय नको म्हणून भाजपचा प्रतिडाव
महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींविरोधात वातावरण तापत आहे. पुणे, सोलापूर बंदला प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यातच चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राम कदम यांनीही यांनीही बेताल वक्तव्ये करून भाजपच्या अडचणींत वाढ केली. महाविकास आघाडीने या अस्मितेच्या मुद्द्याचे राजकारण करत सरकारची कोंडी केली आहे. आता राज्यपाल बदलणे हाच पर्याय सत्ताधाऱ्यांकडे आहे. पण त्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये याची खबरदारी घेतली जात आहे. म्हणूनच मविआच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने प्रतिआंदोलनाचा डाव टाकला. शिंदेसेनेने बंद पुकारून परजिल्ह्यातून येणाऱ्या मविआच्या आंदोलकांची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार यात शंकाच नाही. त्यात विरोधकांच्या हल्ल्यापासून बचावासाठी भाजपने मविआविरोधी आंदोलनाची ढाल आतापासूनच पुढे केलेली दिसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.