आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (मंगळवार 8 डिसेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गुजरातमध्ये बंद पाळण्यात येत असून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान गुजरात सरकार लोकशाही अधिकारांचा वापर करणाऱ्यांना अटक करण्याची धमकी देत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे.
राजीव सातव यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट केले आहे. या पत्रकामध्ये भारत बंदचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा आदेश दिला आहे. पत्रकावरून सातव यांनी सरकारवर निशाणा साधला. लोकशाही हक्कांचा वापर करण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही अटक करण्याची धमकी आता गुजरात सरकार देत आहे. असा आरोप सातव यांनी केला. तसेच गुजरातमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा सवालही सातव यांनी केला आहे.
This is anarchy at its very peak. BJP Gujarat govt is now threatening to arrest anyone who ever dares exercises his/her democratic rights.
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) December 8, 2020
Is there no place for freedom of speech or dissent left in Gujarat? BJP Gujarat model #Shame pic.twitter.com/8hjJeb8Ig2
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.