आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या "या कृषी मंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वर पायं, "खोके सरकार हाय हाय'', "५०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे'' ,''सट्टा लावतो म्हणणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो'', अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. या वेळी तेथून जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मात्र विरोधकांनी हस्तांदोलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.