आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगदसिंह कोश्यारी यांच्या याविषयावरुन चांगलाच 'सामना' रंगला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेने उत्तर दिले होते. आता यावर अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार? असा खोचक सवाल अमृता फडणवीसांनी केला.
अमृता फडणविसांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी म्हटले की, 'माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार' असा प्रश्न अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत त्यांनी हा सवाल उपस्थित केला.
मेरे पास ना घर न द्वार,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 15, 2020
फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ? https://t.co/RCLKwtM3tU
अमृता यांनी बुधवारी ट्विट केले होते की, 'महाराष्ट्रात बार आणि दारुची दुकाने उघडण्याची सूट आहे, मात्र मंदिर हे धोक्याच्या झोनमध्ये आहेत. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना सर्टिफिकेट देऊन स्वतःला सिद्ध करावे लागते, असे लोक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) लागू करण्यात अपयशी ठरतात.'
वाह प्रशासन - bars and liquor shops are wild wide open but temples are danger zones ?
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 13, 2020
Definitely sometimes ‘certificate’ is required to prove the saneness of some dicey creatures who are incapable of having SOPs in place ! 🤔🙄 #Maharashtra
या ट्विटवरुन शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देत असताना अमृता फडणवीसांना जोरदार उत्तर दिले होते 'अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेमध्ये राहावे. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. जर आम्ही तोंड उघडले तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही' असा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला होता.
यासोबतच अमृता फडणवीसांवर निशाणा साधत त्या म्हणाल्या होत्या की, 'राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या 'Dicey Creature' ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही.त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.'
राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या 'Dicey Creature' ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही.त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.(1/2)@fadnavis_amruta
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 14, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.