आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार:बंडखोर आमदारांनी 24 तासांत येऊन संपर्क साधावा; संजय राऊतांचे आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. बंडखोर आमदारांनी 24 तासांत येऊन आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. ते मुंबईत बोलत होते. यावेळी शिंदे गटाच्या तावडीतून सुटून आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर राऊत, पाटील आणि देशमुख यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

तर विजय आमचाच

संजय राऊत म्हणाले की, सध्या आमच्याकडे वीस आमदार आहेत. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले 21 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत. उद्या विधानसभेत संघर्ष झाल्यास. तिथे बहुमत चाचणी झाल्यास. महाविकास आघाडीचा विजय नक्की होईल. इतका आकडा आमच्याजवळ आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार नक्की आमच्या बाजून आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी शिंदे यांच्या गटातून आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आपण कसे सुटून आलो, याची आपबिती पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगितली.

अंधारात ठेवून नेले

कैलास पाटील म्हणाले, आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेण्यात आले. पहिल्यांदा मी दरवाजा उघडून गाडीतून उतरलो. डिव्हायडर ओलांडून मुंबईच्या दिशेने लागलो. मागून लोक आले, तर मला शोधतील म्हणून रस्ता बदलला. दोन ट्रकच्यामधून चालत आलो. मोटारसायकलवाल्याला लिफ्ट मागितली. त्याने एका गावापर्यंत सोडले. तिथे हॉटेल होते. तिथे विचारणा केली. मुंबईकडे जायचे असल्याचे ट्रकवाल्यांना सांगितले. मात्र, ते तयार झाले नाहीत. खासगी वाहनांना विनंती केली. शेवटी एका ट्रकवाल्याने मला लिफ्ट दिली. त्या दरम्यान पाऊस सुरू होता. पावसात भिजलो. ट्रकवाल्याने मला दहिसर टोलनाक्यापर्यंत सोडले. तिथे मला न्यायला एक व्यक्ती आली. ज्या शिवसेनेने मला जिल्हा परिषद सदस्य केले, आमदार केले, त्या शिवसेनेशी प्रतारण करणं मला नको वाटलं. तिथे असलेल्या आमदारांनाही ग्रुप-ग्रुपने नेले असेल. बरेच आमदार असतील की, त्यांची यायाची इच्छा असेल. मात्र, त्यांच्या अडचणीमुळे ते येऊ शकत नाहीत.

अन् वस्तुस्थिती कळली

नितीन देशमुख म्हणाले की, २० तारखेला विधान परिषद निवडणुका झाल्या. पाचच्या दरम्यान शिंदे साहेबांनी बंगल्यावर बोलावलं. माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार प्रकाशभाऊ होते. त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं. ते म्हणाले चला जाऊया. आमच्या मनात शंका नव्हती. त्यामुळे बसलो. गाडी ठाण्याच्या दिशेने गेली. तिथून पालघरला गेलो. कोल्हापूरचे आमदार म्हणाले कुठे चाललो. ते म्हणाले वनगांकडे जाऊ. तिथे शंका निर्माण झाली. तिथल्या हॉटलेचालकांना विचारले, रस्ता कुठे जातो. त्यांनी सांगितले गुजरातला जातो. तिथे तीन मंत्री आले. शंभूराज, सत्तार साहेब आणि भुमरेसाहेब. त्यांची शिंदेंसोबत चर्चा झाली. प्रकाशभाऊ भ्यालेले होते. त्यांनी प्रकाशभाऊंना उतरवलं. तिथे सत्तार साहेब, शंभूराज बसले. तेव्हा त्यांचे फोन सुरू झाले. हा निघाला की नाही, तो निघाला की नाही. आमदारांनी शंका विचारण्या सुरू केल्या. तेवढ्यात कैलास गायब झाल्याचे समजले. वस्तुस्थिती कळाली होती.

अधिकाऱ्यांशी वादावादी

आमदार देशमुख म्हणाले की, सूरतमध्ये हॉटेल मोठे होते. तगडा बंदोबस्त होता. आयपीएस अधिकारी होते. त्यांच्याशी वाद झाले. त्यांना प्रशासन चालवता की भाजपची गुलमागिरी करता म्हणालो. त्यांच्याशी वाद झाले. मी तिथून पायी निघालो. साडेबारा ते तीनपर्यंत रस्त्यावर चालत होतो. पाऊस सुरू झाला. मोबाइलमधली बॅटरी कमी झाली. आमचे संभाषण पोलिस ऐकत असल्याचा संशय आला. पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं. नेलं. सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. मला शंका निर्माण झाली.