आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीने मुंबईच्या सत्र न्यायालयात दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका मागे घेतली आहे. गेल्या महिन्यात, एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कर्मचार्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल अर्णब, त्यांची पत्नी सम्याब्रता रे, त्याचा मुलगा आणि दोन इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीवर होता. याच प्रकरणात अटक टाळण्यासाठी गोस्वामी यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र, अद्याप पत्नीची याचिका मागे घेण्यात आली आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही.
अर्णब आणि त्याची पत्नी यांच्यावर हा आरोप आहे
खरे तर, नोव्हेंबर 2018 मध्ये इंटीरियर डिझायनर अन्वय नाइक आणि त्यांच्या आईला कथिररित्या आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात चार नोव्हेंबरला पोलिसांची टीम अर्णब गोस्वामीलला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. दरम्यान पोलिसांनी आरोप केला होता की, त्यांनी एक महिला पोलिस कर्मचारीसोबत कथितरित्या मारहाण केली होती. याच प्रकरणात मध्य मुंबईच्या एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गेल्या आठवड्यात अर्णब गोस्वामीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
या कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला
अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353 (लोकसेवकाच्या कामात अडथळा आणणे), 504 (शांततेचा भंग केल्याबद्दल कुणी जाणूनबुजून अपमान करणे) आणि 506 (फौजदारी धमकी / धमकी देणे) आणि सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवण्यासंदर्भात केस दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात 49 वर्षीय पोलिस अधिकारी सुजाता तनवाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.