आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत उद्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. महापुरुषांच्या वक्तव्याविरोधात शनिवारी मविआकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर त्याला उत्तर म्हणत भाजपकडून आशिष शेलार यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहास संजय राऊत यांनी वाचावा, असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शुक्रवारी खासदार संजय संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले. भाजपचे नेते आमदार भाई गिरकर यांनी राऊतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनी वाचावी म्हणून दोन पुस्तके पाठवली आहेत, असा चिमटाही पत्रकार परिषदेत काढला.
ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी
शेलार म्हणाले की, हे सगळे झाल्यावरही संजय राऊत यांनी माफी मागितली नाही. ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला, त्यांच्यासोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पुढचे पाऊल टाकत जन्म स्थळाचा वाद निर्माण केलाय. याचा भाजपकडून निषेध करतो. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असेही शेलारांनी म्हटले आहे.
उद्याचा मोर्चा कशाला?
सुषमा अंधारेंकडूनही दैवतांचा अपमान सुरूय. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे शांतच आहेत, असा टोला लगावताना उद्याचा मोर्चा कशाला करताय, असा टोलाही शेलारांनी लगावला. या सर्व वक्तव्याविरोधात उद्या भाजपकडूनही मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार असल्याचेही शेलारांनी सांगितले.
शेलार पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचया जन्म कुठे झाला याबद्दल वाद निर्माण करण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक असल्याचा गंभीर आरोपही शेलारांनी केला. या वादामुळे आंबेडकर प्रेमींवर अफगाणी संकट आले आहे. तालिबानी भागामध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमेवर हल्ला झाला, हे आम्ही पाहिले आहे. आता शांततापूर्व पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंची शिवसेना का करते आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राऊतांनी अज्ञान पाजळले
संजय राऊत हे त्यांचे अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाही, असे म्हणताना संजय राऊत यांच्या डॉक्टर आणि कंपाऊडर यांच्या किस्सा आणि WHO सल्लागार कोण असू शकतात असे म्हणतानाच आता याची मस्ती आणि मिशाद बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थळाबद्दल भ्रम निर्माण करण्यापर्यंत गेली आहे. खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चूक आहे, या पद्धतीने खोटे पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय, संविधानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिला हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहे का, असा उलट सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. स्वातंत्रपासून नव्या देशाच्या निर्माणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेले योगदान तुम्हाला मान्य आहे का.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.