आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई उच्च न्यायालयाने कंगना रणोतला मोठा झटका दिला आहे. कंगनाने न्यायालयात जावेद अख्तर यांच्याकडून दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत कंगनाला मोठा धक्का दिला आहे. जावेद अख्तर यांनी कंगना रणोतवर बदनामी करण्याच्या आरोपांखाली तक्रार दाखल केली होती. परंतु, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली.
ही दाखल केलेली याचिका रद्द करण्यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदरील प्रकरणात अभिनेत्रीला मार्च 2020 ला जामीन मिळाला होता. परंतु, जारी करण्यात आलेले वॉरंट रद्द करण्यासाठी अभिनेत्रीने न्यायालयात धाव घेतली. परंतु, सुनावणीदरम्यान अभिनेत्रीने न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले होते.
प्रकरण काय?
जावेद अख्तर यांच्यावर निराधार आरोप करत बदनामी करण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप कंगना रणोतवर आहे. याप्रकरणी त्यांना अनेक वेळा समन्सदेखील बजावण्यात आले. परंतु, ती सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर न राहिल्याने कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, नंतर न्यायालयाने यात प्रकरणात जामीन मंजूर केला होता.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आला होता गुन्हा
कंगनाने मुलाखतीत काय म्हटले होते?
जावेद अख्तरने तिला घरी बोलावून धमकी दिली होती. कंगनाच्या मते, अख्तर म्हणाला होता की राकेश रोशन आणि त्याचे कुटुंब खूप मोठे लोक आहेत. जर त्यांनी त्याची माफी मागितली नाही तर ते त्याला तुरुंगात टाकू शकतात असे कंगानाने एका मनोरंजन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही यापूर्वी सोशल मीडियाद्वारे असाच दावा केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.