आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्याहून 37 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसने भररस्त्यात अचानक पेट घेतला. मनिष ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. गुरुवारी पहाटे 4 वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी नजीक ही घटना घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली. या ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी हे थोडक्यात बजावले आहे. यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाल्याची माहिती आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आता सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
मनिष ट्रॅव्हल्स ही बस पहाटेपुण्याहून गोव्याला निघाली होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली. यानंतर बसने अचानक पेट घेतला. बस चालकाच्या हे लक्षात आले आणि त्याने लगेच बस थांबवली. या बसमधील प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ निघाले आणि बसने पूर्णपणे पेट घेतला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच कुडाळ येथील अग्निशमन बंब घटनास्थळी पोबोतवे. अनेक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या घटनेनंतर वैभववाडी एडगाव परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सकाळी सात वाजता रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.