आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Cabinet Minister Mangalprabhat Lodha Expressed His 27 year old Pain And Said I Waited For The Phone Call Every Time For The Post Of Cabinet Minister, This Is An Opportunity.

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढांनी मांडली 27 वर्ष जुनी वेदना:प्रत्येक वेळी मंत्रिपदासाठी फोनची वाट पाहिली; मात्र फोनच आला नाही

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी 1995 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. तेव्हापासून माझ्या पक्षाचे सरकार तीनदा बनले आणि या दरम्यान सुमारे 7 वेळा कॅबिनेट स्थापन झाले. त्या दरम्यान मी प्रत्येक वेळी कॅबिनेट मंत्री बनवण्याच्या फोनची वाट पाहत राहिलो पण फोन कधीच आला नाही. भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आता 27 वर्षांनंतर कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर आपली ही जुनी व्यथा सार्वजनिक केली आहे.

मात्र यावेळी 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री बनवण्याचा फोन आला. पण यावेळी जेव्हा कॉल आला तेव्हा मी कोणतीही तयारी केली नाही, कारण याआधी दोनदा शपथविधीसाठी कपडे शिवले होते, तेव्हा ते व्यर्थ गेले होते. त्यामुळे यावेळी मंत्रीपदाची शपथ घेताना मी पूर्वीचे सामान्य कपडे आणि वडिलांनी दिलेला दुपट्टा घालून गेलो, असेही ते पुढे म्हणाले. रविवारी कॅबिनेट मंत्री लोढा यांनी राजस्थानी समाजासमोर आपली 27 वर्षे जुनी व्यथा मांडली. जालोर सिरोही विकास परिषद, 36 कौम एकता परिषद, राजस्थान मित्र मंडळ, राजपुरोहित समृद्धी परिषद, श्री रामदेव सेवा संस्था, जागरूक गौ सेवा संस्था यासारख्या इतर अनेक राजस्थानी संघटनांनी रविवारी मंगल प्रभात लोढा यांचा सन्मान केला.

भाजपचे काही आमदार नाराज!
विशेष म्हणजे यावेळी भाजपने देशातील प्रसिद्ध सर्वात श्रीमंत बिल्डर्सपैकी एक मंगल प्रभात लोढा यांना राज्य सरकारमध्ये पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांसारखे खाते देऊन कॅबिनेट मंत्री केले आहे. याशिवाय त्यांना नुकतेच मुंबई उपनगरचे पालकमंत्रीही करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनण्यापूर्वी लोढा हे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते.

लोढांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक अवघड जाईल, असे भाजपला वाटत होते, त्यामुळे आशिष शेलार यांना मंत्र्याऐवजी मुंबईचे अध्यक्ष करण्यात आले. मात्र, अतुल भातखळकर, अमित साटम, सुनील राणे, मनीषा चौधरी यांच्यासह भाजपचे अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक होते. मात्र लोढा यांच्यामुळे मंत्री होऊ न शकल्याने या आमदारांमध्ये आतून नाराजी आहे.