आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या पद्धतीचे विधान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवछत्रपतीबद्दल केले ते चुकीचे होते. या मुद्द्यावर केंद्र आणि राज्यसरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, परंतु मला खात्री आहे, आज ना उद्या केंद्र सरकारला त्यावर निर्णय घ्यावा लागेल, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पवार म्हणाले, राज्यात महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये राग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत जबाबदार लोकांनी केलेली वक्तव्ये सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया शनिवारच्या मोर्चात दिसेल. तसेच उदयनराजे यांनी चांगली भूमिका घेतली. त्याचे आम्हाला समाधान वाटते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायला हवी ताेती, ती घेतली नाही. दोन्ही सरकारची भूमिका बघ्याची आहे, त्याबद्दल लोकांच्या मनात संताप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.